ज्यांच्यावर संशय तो अरबाज आपल्याच घरी
दोन बहिणी घरातून निघताना सोने घेवून पसार झाल्या की त्याना कोणी पळवून नेल याचा तपास हा सध्या पोलीस करत आहेत. एकाच्या कपड्यात राठोड नावाच्या व्यक्तीचा नंबर आढळून आला आहे. मात्र ज्या तरुणावर संशय होता ज्या एका मुलीसोबत त्याचे संबंध होते. त्याची पोलीसांनी चौकशी केली मात्र चौकशीमध्ये वेगळ सत्य बाहेर आल. ते म्हणजे अरबाज नावाच्या तरुणावर संशय होता तो तरुण आपल्या घरीच निघाला. या प्रकरणात लव जिहाद काही आहे का? याची चौकशी करण्यात आली मात्र तो घरी होता. त्याने जी माहिती दिली ती म्हणजे त्या मुलीचे आणि माझ ब्रेक अप झाल आहे. तिच्याशी आता माझा कोणताही संबंध नसून माझा तिचा संपर्क नाही अशी माहिती त्याने दिली आहे. मात्र या घटनेचा पोलीस आता कसून तपास करत आहेत. खरच या घटनेत लव जिहाद हा अँगल आहे का हे पहिल जात आहे.
संशय अरबाजवर आणि चिठ्ठीमध्ये निघाला राठोड
घरातून निघताना एक चिठ्ठी मिळाली आहे. त्या चिठ्ठीमध्ये राठोड नावाच्या व्यक्तीचा नंबर आहे. आता हा राठोड कोण आहे? त्याचा यांच्याशी काय संबंध होता? त्या नंबर वरून याचा शोध घेतला जात आहे. मात्र एकाच वेळी घरातून दोन बहिणी पळून गेल्याने खळबळ उडाली आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिसिंगची तक्रार देण्यात आली होती. या घटनेचा तपास लवकर व्हावा आणि मुली परत मिळाव्यात अशी मागणी कुटुंबियांची आहे. आता पोलीस या घटनेमागील सत्यात तपासत आहेत. खरच लव जिहाद आहे का? या अँगलने चौकशी करण्यात आली आहे. मात्र अरबाज हा आपल्या राहत्या घरात आढळून आला आहे. आता या मुली न सांगता घरातील सोने घेवून कुठे फरार झाल्या याचा शोध घेतला जात आहे.
Ans: कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात.
Ans: पोलिसांनी तपास केला; संशयित तरुण घरीच आढळला.
Ans: चिठ्ठीत मिळालेल्या नंबरच्या आधारे मुलींचा शोध सुरू आहे.






