भारताविरोधात बांगलादेश रचतोय मोठे षडयंत्र; चीनला हाताशी धरून करणार थेट देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर वार? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
ढाका : सिलीगुडी कॉरिडॉरला भारताचा चिकन नेक म्हटले जाते. हा भारतीय उपखंडाचा सर्वात पातळ भाग आहे, जो नेपाळ आणि बांगलादेश दरम्यान स्थित आहे आणि संपूर्ण ईशान्येला देशाच्या इतर भागाशी जोडतो. कूचबिहारमधील मेखलीगंजजवळ तीस्ता नदी भारतातून बांगलादेशात प्रवेश करते. मोक्याच्या सिलीगुडी कॉरिडॉरपासून ते फक्त 100 किलोमीटर अंतरावर आहे.
बांगलादेश भारताला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. अहवालानुसार मोहम्मद युनूसचे प्रशासन तिस्ता प्रकल्पात चीनला सहभागी करून घेऊ शकते. ज्यामुळे भारताच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. बांगलादेश तीस्ता नदीच्या संवर्धन आणि व्यवस्थापनाच्या प्रस्तावित बहुउद्देशीय प्रकल्पात चीनला सामील करू शकते, असे टेलिग्राफच्या वृत्तात म्हटले आहे. त्यासाठी युनूस प्रशासनाने जनसुनावणीचा मार्ग अवलंबला असून त्यावर एकमत घडले आहे. ही नदी सिक्कीममध्ये उगम पावते आणि हिमालयीन राज्य आणि उत्तर बंगालच्या काही भागांमधून सुमारे 305 किलोमीटरचे अंतर पार करून बांगलादेशात प्रवेश करते. तीस्ता प्रकल्पाबाबत भारत आणि बांगलादेश यांच्यात बराच काळ वाद सुरू आहे, मात्र शेख हसीना यांच्या सरकारने चीनला या प्रकल्पापासून दूर ठेवले होते.
रविवारी, उत्तर बांगलादेशातील रंगपूर जिल्ह्याच्या प्रशासनाने कावानियामध्ये “तीस्ता निया कोरोनियो (तीस्ताचे काय करावे)” या विषयावर सार्वजनिक सुनावणी घेतली, असे द टेलिग्राफने वृत्त दिले. बांगलादेशी प्रसारमाध्यमांनी सईदा रिझवाना हसन या सुनावणीच्या वेळी सांगितले की, “चीन सरकारने नदीच्या संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी याआधी एक मास्टर प्लॅन तयार केला होता. आम्ही त्यांच्याशी चर्चा करत आहोत. त्यांनी यासाठी दोन वर्षांचा वेळ मागितला आहे. आम्ही त्यांना दोन वर्षांचा वेळ देण्याचे मान्य केले आहे आणि तीच्या काठावर राहणाऱ्या लोकांचे मत घेऊन मास्टर प्लॅन तयार करण्यात यावा, अशी अटही जोडली आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : आता एर्दोगान सरकारवरही भीतीचे सावट! तुर्कियेमध्ये महिला ज्योतिष्याने केली ‘या’ मोठ्या नेत्याच्या मृत्यूची भविष्यवाणी
तीस्तावरून भारत आणि बांगलादेशमध्ये नवा वाद
सय्यदा रिजवाना हसन या बांगलादेशच्या पर्यावरण, वन, हवामान बदल आणि जल संसाधन मंत्रालयाच्या सल्लागार आहेत. याशिवाय, या प्रकल्पासाठी दुसरी अट म्हणजे सुमारे 1 अब्ज डॉलर्स खर्चाचा हा प्रकल्प, ज्यामध्ये नदीचे गाळ काढणे, जलाशयांचे बांधकाम, नदीकाठी मलनिस्सारण व्यवस्था आणि तिस्ताच्या दोन्ही काठावर बंधारे आणि सॅटेलाइट टाउनशिप बांधणे यांचा समावेश आहे, ही सर्व कामे डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण झाली पाहिजेत. तिस्ताच्या पाण्याचा वाद अनेक दिवसांपासून सुरू असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधामुळे हा प्रकल्प २०११ पासून रखडला आहे. त्यामुळेच चीनने चार वर्षांपूर्वी या प्रदेशात प्रवेश करून आपला प्रस्ताव मांडला.
गेल्या वर्षी माजी पंतप्रधान शेख हसीना भारत दौऱ्यावर आल्या असताना भारताने चीनला रोखण्यासाठी या प्रकल्पाबाबत आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या होत्या. यावेळी शेख हसीना सरकारसोबत करार करण्यात आला. ज्याअंतर्गत भारताने या प्रकल्पासंदर्भात ढाका येथे तांत्रिक टीम पाठवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्याचवेळी, गेल्या वर्षी जुलैमध्ये भारत भेटीदरम्यान शेख हसीना यांनी या प्रकल्पात भारताला प्राधान्य देण्याबाबत बोलले होते. यामागे त्यांनी तीस्ता नदीचा उगम भारतात असल्याचे सांगितले होते. पण शेख हसीना यांचे सरकार गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पडले आणि त्यांना भारतात पळून जावे लागले. शेख हसीना सरकार पडल्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने भारतविरोधी भूमिका स्वीकारली आहे. या प्रकल्पात चीनचा समावेश झाल्यास भारताच्या अडचणी वाढतील.
भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका?
बालूरघाटस्थित नदी तज्ज्ञ तुहिन सुभ्रा मंडल यांनी टेलिग्राफच्या अहवालात म्हटले आहे की, “बांगलादेशचे अंतरिम सरकार या प्रकल्पात चीनच्या सहभागाचा मार्ग मोकळा करत आहे आणि त्यासाठी जनसुनावणी मंचाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे, हे अगदी स्पष्ट आहे.” त्याचवेळी सिलीगुडी येथे राहणाऱ्या एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, तीस्ता प्रकल्पात चीनला सहभागी करून घेण्याचा निर्णय हा सुरक्षेचा मोठा प्रश्न असेल. ते म्हणाले की नदी भारतातून बांगलादेशात प्रवेश करते ते ठिकाण (कूचबिहारमधील मेखलीगंजजवळ) धोरणात्मक सिलीगुडी कॉरिडॉरपासून फक्त 100 किलोमीटर अंतरावर आहे.
सिलीगुडी कॉरिडॉरला भारताचा चिकन नेक म्हटले जाते. हा भारतीय उपखंडाचा सर्वात पातळ भाग आहे जो नेपाळ आणि बांगलादेश दरम्यान स्थित आहे आणि संपूर्ण ईशान्येला देशाच्या इतर भागाशी जोडतो. लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, बांगलादेशला आमच्यासाठी आणखी समस्या निर्माण करायच्या आहेत, असे दिसते. बांगलादेशी माध्यमांच्या वृत्तानुसार, रंगपूर, लालमोनिरहाट, गायबांधा, कुरीग्राम आणि निलफामारी या जिल्ह्यांमध्ये राहणारे शेकडो लोक या जनसुनावणीला उपस्थित होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘आम्ही गाझा घेणारच आहोत…’ जॉर्डन किंगसोबतच्या बैठकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी दाखवली कठोर भूमिका
तुमच्यासाठी हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे की जलपाईगुडी जिल्ह्यातील गजोलडोबा येथे आणि सिलीगुडीपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असलेले तीस्ता बॅरेज, तीस्ता नदीवर बांधलेले शेवटचे धरण आहे, जिथून पाणी खाली सोडले जाते. येथून पाणी जलपाईगुडी आणि कूचबिहार जिल्ह्यातील काही भाग मार्गे बांगलादेशात प्रवेश करते. असिफ महमूद साजिब भुईया, ग्रामीण विकास आणि सहकार्य आणि युवा आणि क्रीडा प्रकरणांवरील बांगलादेशचे सल्लागार, म्हणाले की, कमी पाण्याच्या महिन्यांत बॅरेजमधून पाणी सोडण्यासाठी भारतावर दबाव आणण्यासाठी ढाका राजनैतिक माध्यमांचा वापर करू इच्छित आहे.