पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नॉर्वेचे पंतप्रधान जोनस गहर स्टोर (फोटो सौजन्य: एक्स/ @narendramodi)
PM Modi UAE Visit : PM मोदींचा UAE दौरा संपन्न; ऊर्जा, तंत्रज्ञानासह अनेक करारांवर शिक्कामोर्तब
नॉर्वेची राजधानी ओस्लो येथील प्रसिद्ध रॉयल पॅलेस येथे नॉर्वेचे राजा हेराल्ड पाचवे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीत दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांना मजबूती देण्यावर विशेष चर्चा करण्यात आली. या उच्चस्तरीय बैठकीत भारत आणि नॉर्वेमधील वाढती जवळीक जागतिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या दौऱ्यात नॉर्वेचे राजा हेराल्ड पाचवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिटने सन्मानित केले. हा सन्मान परदेशी राष्ट्राप्रमुखांना किंवा जागतिक स्तरावर मानवतेची सेवा करणाऱ्या महान व्यक्तींनी दिला जातो. पंतप्रधान मोदींनी हा सन्मान १४० कोटी भारतीय जनतेला समर्पित केला. तसेच हा सन्मान भारत आणि नॉर्वेतील खऱ्या आणि मजबूत मैत्रीचे प्रतीक असल्याचे म्हटले.
या दौऱ्यात भारत आणि नॉर्वेमध्ये तंत्रज्ञान आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर आणि पंतप्रधान मोदी यांच्या द्विपक्षीय चर्चेनंतर दोन्ही देशांनी संबंधांचा विस्तार करण्यासाठी ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपची घोषणा केली.
यामध्ये भारत मानवी कौशल्य, प्रकल्पाला गती देणे आणि कामाचा मोठा विस्तार करण्यासाठी योगदान देणार आहे. तर नॉर्वेकडून प्रगत तंत्रज्ञान आणि गुंतवणूक केली जाणार आहे.
Jeg hadde fruktbare samtaler med statsminister Jonas Gahr Støre i Oslo. Et av de viktigste høydepunktene var oppgraderingen av vårt bilaterale partnerskap til et grønt strategisk partnerskap, som vil styrke samarbeidet innen ren energi, bærekraftig vekst, den blå økonomien og… pic.twitter.com/MNslB1hMmi— Narendra Modi (@narendramodi) May 19, 2026
Ans: नॉर्वेचे राजा हेराल्ड पाचवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिटने सन्मानित केले.
Ans: ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप दोन्ही देशांतील पर्यावरण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एक ऐतिहासिक करार आहे. यामध्ये भारताचे मानवी कौशल्य व कामाचा वेग आणि नॉर्वेचे प्रगत तंत्रज्ञान आणि भांडवलाची गुंतवणूक होणार आहे. यामुळे दोन्ही देशांच्या कंपन्यांना जागतिक स्तरावर पूर्यावरणपूरक आणि नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यास मदत होईल.






