'तर खरेदी करु नका...' ; रशियन तेल खरेदीवरुन भारताचा अमेरिका आणि पाश्चत्य देशांना थेट सल्ला (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
S. Jaishankar : नवी दिल्ली : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी रशियन तेल खरेदीवरुन अमेरिका आणि पाश्चत्य देशांना स्पष्ट उत्तर दिले आहे. त्यांनी भारत आणि रशियामधील तेल व्यापाराला समर्थन करत हा राष्ट्रीय आणि जागतिक हिसातासाठी असल्याचे स्पष्ट केले आहे. भारताच्या उर्जा सुरक्षा आणि रशियन तेल खेरदीवरील ट्रम्प यांच्या टीकेलाही जयशंकर यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे.
द इकॉनॉमिक टाईम्स वर्ल्ड लीडर्स फोरममध्ये जयशंकर यांना इतर देशांच्या भारताच्या व्यापारावरील टीकेवर प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी जयशंकर यांनी म्हटले की, हे अत्यंत हास्यास्पद आहे, व्यापार-समर्थक अमेरिका आणि युरोपीय देश दुसऱ्या देशांच्या व्यापारवर टीका करत आहे.
युरोपीय देश आणि अमेरिका दोघेही भारतासोबत आणि रशियासोबत व्यापार करतात. जर त्यांना आमच्याशी व्यापार करण्यावर अडचण असेल तर त्यांनी तो करु नये, त्यांनी भारताकडून तेल आणि रिफाइंड खरेदी न करण्यास सांगितले आहे. त्यांच्यावर कोणताही दबाव नाही असे जयशंकर यांना स्पष्टपणे म्हटले आहे.
याशिवाय एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या भारतावरील टॅरिफवरही चोख प्रत्युत्तर दिले आहेत. त्यांनी अमेरिका भारतासोबत भेदभाव करत असल्याचे म्हटले आहे. रशियाकडून तेल खरेदी करण्यावरुन भारतावर टॅरिफ लादण्याचा ट्रम्प यांचा निर्णय चुकीचा असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.
सध्या अमेरिका आणि भारताचे व्यापार संबंधामध्ये तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेने सध्या भारतावर ५०% टॅरिफ लागू केला आहे, यातील २५% दंड लागू करण्यात आला आहे. रशियाकडून तेल खरेदी करण्यावर ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादले आहे.
#WATCH | Delhi: At The Economic Times World Leaders Forum 2025, EAM Dr S Jaishankar says, “It’s funny to have people who work for a pro-business American administration accusing other people of doing business. If you have a problem buying oil or refined products from India, don’t… pic.twitter.com/rXW9kCcVuv
— ANI (@ANI) August 23, 2025
जयशंकर यांच्या मते २०२२ मध्ये तेलाच्या किंमती प्रचंड वाढल्या होता. यामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण होते. यावेळी भारताने रशियाकडून तेल खरेदी केले. ज्यामुळे किंमतीमध्ये स्थिरता आली. भारताचा उद्देश हा जागतिक बाजारपेंठांमध्ये स्थिरता निर्माण करणे आहे. जागतिक स्तरावर आर्थिकरित्या संतुलन ठेवण्यासाठी भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याचे जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे. यामध्ये भारताने राष्ट्रीय आणि जागतिक असे दोन्ही हित साधल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.