UAE visa new rules: सावधान! युएई व्हिसा नियमात मोठा बदल; प्रवास करण्यापूर्वी 'हे' नक्की वाचा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
UAE visa new rules : संयुक्त अरब अमिराती (UAE) हा देश भारतीयांसह जगभरातील प्रवाशांचा, पर्यटकांचा आणि रोजगार शोधणाऱ्यांचा नेहमीच आवडता ठिकाण राहिला आहे. पण आता व्हिसा (Visa) प्रक्रियेत एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. यूएईने ताज्या नियमांनुसार प्रत्येक व्हिसा अर्जदाराला पासपोर्टचे बाह्य कव्हर पेज (ज्यावर देशाचे नाव आणि चिन्ह असते) सादर करणे अनिवार्य केले आहे.
पूर्वी व्हिसा अर्ज करताना पासपोर्ट बायोडाटा पेज, फोटो, तिकिटे किंवा इतर कागदपत्रे सादर करावी लागत होती. परंतु पासपोर्टचे बाह्य कव्हर पेज अनिवार्य नव्हते. आता मात्र हा नियम कडक करण्यात आला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : AI वर बोलताना पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची जीभ घसरली; ‘ही’ लाजिरवाणी बाब सोशल मीडियावर VIRAL
हा नियम फक्त पर्यटक व्हिसासाठीच नाही तर –
अशा सर्व प्रकारच्या अर्जांवर लागू होणार आहे. म्हणजेच, यूएईला भेट देऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने हा बदल गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.
नव्या नियमानुसार अर्जदारांनी खालील कागदपत्रे तयार ठेवावीत:
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Russia US: युक्रेनबाबत काय योजना आहे? संशयाच्या सावटाखाली Modi-Putin यांच्यात फोन कॉल
यूएईच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी अद्याप अधिकृत निवेदन जाहीर केलेले नाही. परंतु काही प्रवास एजंट्सच्या मते, यामागचे मुख्य कारण अर्जदाराचे राष्ट्रीयत्व स्पष्टपणे पडताळणे हे आहे. अनेकदा अर्जदार चुकून किंवा मुद्दाम आपले राष्ट्रीयत्व चुकीचे लिहितात. तसेच पासपोर्टवरील माहिती खूप लहान अक्षरांत असते. अशावेळी तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना अडचण होते. परंतु पासपोर्टचे कव्हर पेज पाहिल्यास लगेचच देशाची ओळख पटते.
यामुळे:
भारतीयांसह लाखो प्रवासी दरवर्षी यूएईला जातात. विशेषतः दुबई, अबुधाबी यांसारख्या शहरांमध्ये रोजगार, व्यवसाय व पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर लोक जातात. नवीन नियमामुळे:
भारतातून यूएईला प्रवास करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे भारतीय अर्जदारांनी हा बदल तातडीने लक्षात घ्यावा. अन्यथा, अपूर्ण कागदपत्रांमुळे व्हिसा अर्ज फेटाळला जाऊ शकतो आणि प्रवासाची संधी गमावली जाऊ शकते. यूएई हा देश नेहमीच आपली नियमावली सुधारत असतो, जेणेकरून प्रक्रिया अधिक सुरक्षित व सोयीस्कर बनेल. नवीन नियमामुळे थोडा त्रास वाढू शकतो, पण यामुळे पारदर्शकता व अचूकता येईल. त्यामुळे प्रवाशांनी काळजीपूर्वक सर्व कागदपत्रे तयार ठेवूनच अर्ज करावा






