बलुचिस्तानमध्ये रक्ताची होळी! BLA च्या हल्ल्यात आतापर्यंत शेकडो पाकिस्तानी सैनिक ठार, निष्पाप नागरिकांचाही बळी (फोटो सौजन्य: AI जनरेटेड)
पाकिस्तानात गृहयुद्धाला सुरुवात? BLA चा एकाच वेळी १४ शहरात हल्ला, ८० हून अधिकांचा बळी
याच वेळी बलुच लिबरेशन आर्मीने दावा केला आहे की, गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या संघर्षात ३०० हून अधिक पाकिस्तानी जवान ठार झाले आहे. परंतु पाकिस्तानी लष्कराने केवळ २२ जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. दरम्यान बीएलएने पाकिस्तानमध्ये ऑपरेशन हा Operation Herof 2.0 पुन्हा जोरदार आणि आक्रमकपणे सुरु केले आहे.
BLA ने सुरक्षा दलांवर, नागरिकांवर आणि पायभूत सुविधांवरही नागरिकांच्या वेशात येऊन हल्ले केले आहे. रुग्णालये, शाळा, बँका, बाजारपेठांना लक्ष्य केले जात आहे. BLA ने क्वेटा, नोशकी, मास्तुंग, दालबंदिन, कलाट, खारान, पंजगुर, ग्वादर, पासनी, तुर्बत, तुम्प, बुलेदा, मंगोचर, लसबेला, केच आणि आवरन या सर्व भागांवर ताबा मिळवला असून या भागांमध्ये एकाच वेळी हल्ला करण्यात आला होता.
याशिवाय पाकिस्तानी लष्कराने देखील बलुच लिबरेशन आर्मी विरोधात रद्द-उल-फिदा-१ नावाची लष्करी मोहिम सुरु केले आहे. पंजगुर आणि हरनाई जिल्ह्यांमध्ये गुप्त सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये BLA च्या २०० हून अधिक सैनिकांचा खात्मा केल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त करण्यात आली असल्याचे लष्कराने सांगितले आहे.
परंतु पाकिस्तानी लष्कर आणि बलुच लिबरेशन आर्मीच्या अंतर्गत संघर्षाचा फटका मात्र नागरिकांना बसला आहे. महिला आणि लहान मुलांसह आतापर्यंत ३६ नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. BLA च्या हल्ल्यांमध्ये पोलिस चौक्या आणि सरकारी कार्यालयांना आग लावण्यात आली आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.गेल्या पाच दिवसांपासून रेल्वेसेवाही ठप्प पडली आहे.
दरम्यान पाकिस्तानने देशातील अतंर्गत अस्थिरतेसाठी भारताला जबाबदार धरले आहे. भारताने हे आरोप निराधार असल्याचे सांगितले आहे. बलुचिस्तान गेल्या अनेक काळापासून स्वतंत्र राष्ट्राची मागणी करत आहे. तसेच लष्कराच्या बलुचिस्तानमध्ये दहशतवाद्यांना आश्रय देण्याच्या विरोधात हा बंड पुकारण्यात आला आहे. यापूर्वी BLA ने पाकिस्तानी लष्कराविरोधात भारताचीही साथ मागितली होती. परंतु भारताने यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या पाकिस्तानमधील अंतर्गत संकट अधिक वाढत चालला आहे.
पाकिस्तानमध्ये अतंर्गत धुसफूस सुरुच! पाकिस्तानी सैन्यासमोर बलुचिस्तानचे मोठे आव्हान






