US Iran War : 'युद्ध कधी संपवायचे आम्ही ठरवू...' ; इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सचा अमेरिकेला थेट इशारा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ट्रम्प यांच्या धमकीनंतरही इराण(Iran) च्या सैन्याने शरणागती पत्करण्यास नकार दिला आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने म्हटले आहे की, सध्याचे युद्ध कधी संपवायचे हे अमेरिका नव्हे, इराण ठरवेल. मंगळवारी (१० मार्च २०२६) IRGC चे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल अली मोहम्मद नैनी यांनी हे विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आम्हाला माहिती आहे तुमचे दारुगोळाचे साठे संपत आहेत, तुम्ही तुमचा सन्मान जपून ठेवण्यासाठी युद्धाने बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहे. जगापासून सत्य लपवत आहात. मात्र यावेळी युद्ध कधी संपवायचे हे आम्ही ठरवणार असे अली मोहम्मद यांनी ठणकावून सांगितले.
याशिवाय IRGC ने जागतिक तेल पुरवठा रोखण्यावरुन ट्रम्प यांच्या हल्ल्याच्या धमकीलाही प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, होमुर्झच्या सामुद्रधनी तेला एक थेंबही नेऊ दिला जाणार नाही, वाहतूक तर सोडाच. इराणच्या या आक्रमक पवित्र्यामुळे जागतिक स्तरावर पुन्हा एकदा इंधन संकट ओढवण्याची शक्यता आहे.
होमुर्झची खाडी ही जगातील सर्वात महत्वाचा सागरी मार्ग आहे. या मार्गावरुन जगातील एकूण कच्च्या तेलाच्या पुरवठ्यापैकी 20 ते 30 टक्के व्यापार या मार्गावरुन होतो. इराणच नव्हे,तर सौदी, यूएई, कुवैत आणि इराक या देशांच्या तेलाचा व्यापारही या मार्गावरुन होतो. इराणने हा मार्ग बंद केला तर जागतिक बाजारात तेलाच्या किंमती तिपटीने वाढण्याची शक्यता आहे. यामुळे भारत, चीनसह जगभरातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला फटका बसू शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार ट्रम्प यांना त्यांच्या सल्लागारांनी इराणसोबत शांततेने संवाद साधून तणाव कमी करण्याचा सल्ला दिला आहे.
मंगळवनारी (१० मार्च) ‘युद्ध समाप्तीचेही संकेत त्यांनी दिले आहेत. वॉल स्ट्रीट जनरलने दिलेल्या वृत्तानुसार, युद्ध दीर्घकाळ सुरु राहिल्यास
थेट अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची शक्यता आहे.
शिवाय या वर्षाच्या शेवटी अमेरिकिते निवडणुका प्रस्तावित आहेत. युद्ध थांबले नाही तर ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षातील लोक नाराज होऊ शकता असा इशार त्यांच्या सल्लागारांनी दिला आहे. या युद्धातून अमेरिकेला लष्करी किंवा आर्थिक फायदा होत नसल्याचे ट्रम्प यांच्या सल्लागारांनी म्हटले आहे. यामुळेच ट्रम्प यांनी युद्ध लवकरच संपेल अशी घोषणा केली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.






