• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Blogs »
  • Like Food Like Mind Nrdm

जसे अन्न तसे मन

आजच्या आधुनिक युगात मनुष्य ‘हेल्थ कॉन्शिअस’ झाला आहे. प्रत्येक पदार्थ खाताना, ते खाल्ल्यानंतर किती कॅलेरीस मिळतील त्याचा हिशोब लावला जातो. पण त्याचबरोबर ते खाताना कोणती काळजी घ्यावी हे सुद्धा समजून घेऊ या.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 05, 2023 | 06:00 AM
जसे अन्न तसे मन
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजच्या आधुनिक युगात मनुष्य ‘हेल्थ कॉन्शिअस’ झाला आहे. प्रत्येक पदार्थ खाताना, ते खाल्ल्यानंतर किती कॅलेरीस मिळतील त्याचा हिशोब लावला जातो. पण त्याचबरोबर ते खाताना कोणती काळजी घ्यावी हे सुद्धा समजून घेऊ या.

एक सत्य आपल्या सर्वांच्या लक्षात राहावे म्हणून याचा उल्लेख येथे करत आहे. वैज्ञानिकांनी एक प्रयोग केला, ज्यामध्ये दोन छोटी झाडे, जी कुंडीमध्ये लावली होती, त्यांना वेगवेगळ्या खोलीत ठेवले. एकसारखा सूर्यप्रकाश, एकी जवळ शास्त्रीय संगीत आणि दुसऱ्या जवळ पाश्चात्य संगीत लावले गेले. आठवडाभर हा प्रयोग केला गेला. त्यानंतरचे निरीक्षण हे होते की, ज्या झाडाजवळ शास्त्रीय संगीत लावले होते, ते झाड टवटवीत आणि फुलांनी बहरलेले दिसले. तर, पाश्चात्य संगीत लावलेले झाड थोडेसे मलूल झालेले दिसले. आणखीन एक प्रयोग केला शिजवलेल्या भातावर. दोन पारदर्शी डब्यांमध्ये शिजवलेला भात ठेवला गेला. तसेच एका डब्यावर लव्ह तर दुसऱ्यावर हेट हे शब्द लिहिले गेले. दोन व्यक्तींना त्या डब्याजवळ जाऊन त्याप्रकारचे विचार मनात आणायला सांगितले. सात दिवस सतत तसे विचार केले गेले. सात दिवसानंतर बघितले तर लव्ह लिहिलेल्या डब्यातला भातावर थोडी हिरवळ बुरशी आली होती.

पण हेट लिहिलेल्या डब्यातल्या भातावर काळी बुरशी आलेली दिसली. तात्पर्य असे की भले झाड असो की पदार्थ; यांवर आपल्या विचारांचा कळत-नकळत परिणाम होतो. म्हणून म्हटले जाते ‘ जसे अन्न, तसे मन आणि जसे मन, तसे अन्न’.

आपल्या जीवनातला अन्न हा सर्वात महत्वाचा आणि गंभीर विषय आहे. कारण आज अन्नामुळे अनेक प्रकारचे आजार होत आहेत. अन्नशुद्धी म्हणजे सात्विक शाकाहारी भोजन, न शिजवलेले स्वच्छ पदार्थ फक्त एवढेच नाही. भाज्या धान्य स्वच्छ धुवून मगच वापरावे पण त्याचबरोबर मनाची शुद्धी ही सुद्धा तितकीच आवश्यक आहे. आपल्या शरीरामध्ये विचारांची स्पंदने बाहेर टाकणारी तीन केंद्रे आहेत. डोळे, हाथ आणि पाय. जेवण बनवण्यासाठी डोळे आणि हाथ यांचा वापर होतो. एखादी व्यक्ती छान स्वयंपाक बनवत असेल तर आपण म्हणतो की ‘हिच्या हाताला चव आहे.’ पण तेच मसाले, तीच कृती वापरून कोणी दुसऱ्याने तोच पदार्थ बनवला तर त्याची चव वेगळी असते. कारण अदृश्यरित्या विचारांचा मसाला ही त्यात पडत असतो. त्याची चव ही जाणवतेच. विचारांची ऊर्जा अपरोक्षरित्या आपल्या शरीरावर आणि मनावरही काम करते.

बाह्यशुद्धीची जसे आपण काळजी घेतो, तसेच आंतरिक शुद्धीवर ही आपण लक्ष ठेवावे. आपण घरामध्ये शिरा बनवतो. हाच पदार्थ देवासाठी बनवला तर तो प्रसाद मानला जातो. घरी बनवला किंवा हॉटेलमध्ये विकला गेला तर त्याला आपण पदार्थ म्हणतो. तीन ही ठिकाणी एकाच पदार्थाचे महत्व वेगळे असते. बनवणाऱ्याची आणि खाणाऱ्यांची भावना ही वेगवेगळी असते. म्हणून स्वयंपाक बनवणे हे एक काम नाही, परंतु फार मोठी जबाबदारी आहे. हृदय परिवर्तनाची सुंदर, प्रेमळ पद्धती म्हणजे अन्न.

आधुनिक युगात हॉटेलमध्ये, रेकडीकर किंवा घरामध्येच स्वयंपाक बनवण्यासाठी आचारी… हे दृश्य दिसते; पण जेवण बनवणाऱ्यांची मानसिकता याच अन्नाद्वारे प्रत्येकाच्या मनावर परिणाम करते, हे सत्य आज आपल्या ध्यानी नाही. एक राजा होता. एके दिवशी त्याच्या राज्यात गुरूंचे आगमन झाले. राजाला मनापासून वाटत होते की आजची रात्र गुरूंनी माझ्या राजवाड्यात भोजन आणि आराम करावा. खूप विनवणी केल्यानंतर गुरूंची स्वीकृती मिळाली. राजाने खूप पाहुणचार केला. पंचपक्वान्ने बनवली गेली. गुरु ही राजावर अत्यंत खुश झाले. गुरूंच्या झोपण्याची व्यवस्था अशा खोलीत केली होती जिथे राजाचा सर्व खजिना ठेवला होता. गुरु जेव्हा त्या खोलीत झोपायला गेले तर त्यांना झोप येईना. वारंवार त्यांना तो खजाना चोरी करण्याचे विचार येऊ लागले. त्या विचारांनी ते हैराण झाले. सकाळ होताच राजाला सांगितले की ‘मला आचाऱ्याला भेटायचे आहे.’

आचाऱ्याबरोबर बोलताना त्यांना समजले की त्या व्यक्तीकडे पैशाची कमतरता असल्यामुळे दिवस-रात्र चोरीचे विचार त्याच्या मनात चालत होते आणि त्याचाच परिणाम की गुरूंना सुद्धा तेच विचार आले. विचार शुद्धी म्हणजेच खरी अन्नशुद्धी. प्रेमाने, शुद्ध विचारांनी, भावनांनी बनवलेले अन्न हे तनाला आणि मनाला पोषक आहार देते. म्हणून स्वयंपाक बनवताना व्यर्थ, नकारात्मक, चिंता, अनेक विचारांचा, शब्दांचा प्रयोग टाळावा. स्वयंपाक घरात शांतता राखावी. विचारांना श्रेष्ठ बनवणारी गीते, भजन अथवा नामस्मरण यांचा उपयोग करावा.

– नीता बेन

bkneetaa24@gmail.com

Web Title: Like food like mind nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2023 | 06:00 AM

Topics:  

  • like
  • maharashtra
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
1

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…
2

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश
3

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश
4

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

जलसिंचन योजनेचा जॅकवेलच पंचगंगा नदीपात्रात कोसळला; तब्बल 33 लाखांचे नुकसान, शेतीचा पाणीपुरवठा बंद होणार?

जलसिंचन योजनेचा जॅकवेलच पंचगंगा नदीपात्रात कोसळला; तब्बल 33 लाखांचे नुकसान, शेतीचा पाणीपुरवठा बंद होणार?

Vastu Tips: देव्हाऱ्यामध्ये दिवे, अगरबत्ती आणि फुले ठेवण्यासाठी काय आहेत नियम आणि उपाय

Vastu Tips: देव्हाऱ्यामध्ये दिवे, अगरबत्ती आणि फुले ठेवण्यासाठी काय आहेत नियम आणि उपाय

विक्रम सोलर IPO चे सबस्क्रिप्शन दुसऱ्या दिवशी वाढले, नवीनतम GMP, ब्रोकरेज हाऊसचा सल्ला आणि इतर तपशील तपासा

विक्रम सोलर IPO चे सबस्क्रिप्शन दुसऱ्या दिवशी वाढले, नवीनतम GMP, ब्रोकरेज हाऊसचा सल्ला आणि इतर तपशील तपासा

Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय

Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.