सध्या अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू असून, जुलैअखेर हे वर्ग सुरू होतील. बारावीचे वर्ग १५ जूनपासून गजबजणार आहेत. त्यापूर्वीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेत कनिष्ठ महाविद्यालयांची नाकेबंदी केली. प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयाला आता आपला यूडायस क्रमांक आणि मान्यता प्रमाणपत्र दर्शनी भागात लावावे लागणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, काही महाविद्यालयांनी अंतर्गत तडजोड करून खासगी कोचिंग क्लासेससोबत जे ‘टायअप’ केले आहेत, त्यांची आता ‘गोपनीय पडताळणी’ केली जाणार आहे.
रोज वर्गशिक्षकांनी हजेरी घेतल्यानंतर मुख्याध्यापकांना स्वतः सीसीटीव्हीद्वारे वर्गातील उपस्थिती तपासावी लागणार आहे. हा सर्व कृती आराखडा तयार असून, शाळा सुरू होण्यापूर्वीच महाविद्यालयांना पाठवून त्याची सक्तीने अंमलबजावणी केली जाणार आहे. लागणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, काही महाविद्यालयांनी अंतर्गत तडजोड करून खासगी कोचिंग क्लासेससोबत जे टायअप केले आहेत, त्यांची आता तपासणी’ केली जाणार आहे. रोज वर्गशिक्षकांनी हजेरी घेतल्यानंतर मुख्याध्यापकांना स्वतः सीसीटीव्हीद्वारे वर्गातील उपस्थिती तपासावी लागणार आहे.
८८ प्रत्येक वर्गात ‘सीसीटीव्ही बसवून त्याचे रेकॉर्डिंग जतन करावे लागणार आहे. मोजक्याच पालकांना हाताशी धरून पालक-शिक्षक समितीच्या नावाखाली काही शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी केलेली शुल्कवाढ बेकायदा ठरवली जाईल. शुल्कवाढ करायची असल्यास सर्व पालकांची अधिकृत बैठक घेणे बंधनकारक असेल. तर लूट करणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा, कॉलेजवर कारवाई करण्यात येईल. अश्विनी लाठकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक विभाग) जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर
CBSE Administrative Change: सीबीएसईमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल; अध्यक्ष आणि सचिवांची तडकाफडकी बदली!






