पालखीच्या स्वागतासाठी पुण्यातील मंदिरे सज्ज; मंडप, रोषणाईसह वारकऱ्यांच्या सुविधांची तयारी पूर्ण
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या २७ एप्रिल २०२६ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील अकरावीचे शैक्षणिक सत्र १५ जुलै किंवा त्यापूर्वी सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक तसेच सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्य मंडळाशी संलग्न सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी १५ जुलैपासून नियमित अध्यापन सुरू होईल, याची दक्षता घ्यावी, तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
दरम्यान, केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिये अंतर्गत प्रवेश सुरू असतानाच महाविद्यालयांनी अध्यापनाची तयारी पूर्ण करून १५ जुलैपासून अकरावीचे नियमित वर्ग सुरू करावेत, असे शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
Maharashtra Rain Alert: घाटमाथ्यावर पावसाचे ‘रौद्ररूप’; तर पुणे शहरात…, हवामान विभागाचा अलर्ट काय?






