(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Share Market Today: शेअर बाजारात तेजीची शक्यता! तज्ज्ञांनी खरेदीसाठी सुचवले ‘हे’ दमदार शेअर्स
युरेनियमची निर्यात केवळ शांततापूर्ण उद्देशांसाठीच केली जाईल आणि ती आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या (आयएईए) सुरक्षा उपायांच्या अधीन असेल. याव्यतिरिक्त, दोन्ही देशांनी पश्चिम आशियातील परिस्थिती आणि त्याचा जागतिक ऊर्जा पुरवठा साखळी व वस्तूंच्या किमतींवर होणाऱ्या परिणामाबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी खुल्या बाजारपेठा आणि नियमांवर आधारित व्यापाराप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली.
भारताला द्रवीकृत नैसर्गिक वायू (एलएनजी) पुरवठ्यामधील ऑस्ट्रेलियाची महत्त्वाची भूमिका आणि ऑस्ट्रेलियाला द्रव इंधन व पेट्रोलियम संबंधित उत्पादनाच्या पुरवठ्यामधील भारताची महत्त्वपूर्ण भूमिका ओळखून, दोन्ही बाजूंनी अखंडित ऊर्जा पुरवठा सुनिश्चित करण्याचा आणि दोन्ही देशांमधील ऊर्जा व्यापार व गुंतवणूक वाढवण्याचा निर्धार केला. याव्यतिरिक्त, भारत आणि ऑस्ट्रेलियाने प्रादेशिक सहकार्य मजबूत करून, ऊर्जा संक्रमणाला गती देऊन, नवीकरणीय ऊर्जा आणि कमी-कार्बन इंधनांना प्रोत्साहन देऊन, आणि सपूर्ण ऊर्जा मूल्य साखळीमध्ये अधिक गुंतवणुकीला प्रोत्साहित करून ऊर्जा पुरवठा साखळी आणखी मजबूत करण्याचा निर्धार केला, व्यापक धोरणात्मक भागीदारीवर भर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि ऑस्ट्रेलिया है चैतन्यशील लोकशाही देश आणि महत्त्वाचे इंडो-पैसिफिक भागीदार असल्याने, त्यांची दृष्टी समान आहे आणि त्याव्यात गाढ परस्पर विश्वास आहे.
गुरुवारी मेलबर्न येथे झालेल्या ‘इंडिया ऑस्ट्रेलिया सीईओ फोरम’ आणि ‘इकॉनॉमिक रोडमॅप बिझनेस रिसेप्शन ‘मध्ये मोदींनी सहभाग घेतला. ऑस्ट्रेलियाच्या सर्वात मोठ्या पेन्शन फंड, ऑस्ट्रेलियन सुपरनेही भारतात मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदींनी लिहिले, ‘मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियनसुपरचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पॉल श्रोडर यांनी जाहीर केलेल्या ५०० दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीचे भारत स्वागत करतो. भारताच्या विकास आणि सुधारणांच्या मार्गावरील जागतिक विश्वासाचे है आणखी एक उदाहरण आहे. तसेच, आपली वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था जागतिक गुंतवणूकदारांना देत असलेल्या प्रचंड संधींचेही हे द्योतक आहे.”
दुर्मिळ खनिजांबाबत एक मोठी घोषणा करताना पंतप्रधान मोदींनी सांगितले की, दोन्ही देश ‘क्रिटिकल अर्थ मिनरल कॉरिडॉर’वर काम करतील. यामुळे दुर्मिळ खनिजांवरील चीनच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसेल. पंतप्रधान मोदींनी सांगितले की, दोन्ही देशांमध्ये अणुऊर्जा क्षेत्रात एक महत्वपूर्ण करार झाला आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाकडून भारताला यूरेनियम पुरवठ्याचा मार्ग मोकळा होईल आणि स्वच्छ ऊर्जेच्या उद्दिष्टांना नवी चालना मिळेल.






