Ashok Kharat News: ५२ कोटींसह परदेशात पळण्याच्या तयारीत होता; तपासात धक्कादायक खुलासा
याच तंत्राचा वापर करून त्याने मोठी रक्कम छोट्या-छोट्या हिश्श्यांमध्ये विभागून काढून घेतली. सूत्रांनुसार, कोपरगाव येथील सहकारी संस्थेत ६५ संशवास्पद खाती उघडण्यात आली. या खात्यांद्वारे ४ दिवसांत २०० हून अधिक व्यवहारांमधून ५२ कोटी रुपये काढण्यात आले. हे खाते महसूल आणि आरटीओ विभागाशी संबंधित काही कथित सरकारी अधिकारी आणि प्रभावशाली कुटुंबांच्या नावावर उघडण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे.
Ashok Kharat Case : अशोक खरातप्रकरणी मोठी अपडेट समोर
बँकेच्या २ लाख रुपयांच्या मयदिच्या नियमातून सुटण्यासाठी प्रत्येक खात्यातून साधारणपणे १.९९ लाख रुपयांचे व्यवहार करण्यात आले. डिसेंबर २०२५ मध्ये वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, जानेवारी ते मार्च दरम्यान म्हणजेच अटक होण्यापूर्वीच्या काळात हे संपूर्ण आर्थिक नेटवर्क कमालीचे सक्रिय होते. तपास यंत्रणांना असेही आढळले की, एकाच दिवशी अनेक खात्यांमध्ये एकसारख्याच रकमेचे व्यवहार झाले, ज्यामुळे हे एक रॅकेट असल्याचे स्पष्ट होते.
अशोक खरातने अटकेपासून वाचण्यासाठी न्यूझीलंड किवा ऑस्ट्रेलियाला पळून जाण्याची यौजना आखली होती, असे पोलिस तपासाता उघड झाले आहे.
भारतीय तपास यंत्रणांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी परदेशातील आपल्या संपर्काच्या माध्यमातून तिथे कायमचे स्थायिक होण्याची तयारीही केली होती.
सध्या केंद्रीय तपास यंत्रणा या संपूर्ण नेटवर्कची चौकशी करत असून, ज्याच्या नावावर हे बनावट व्यवहार झाले आहेत, त्या सर्व खातेदारांच्या भूमिकेचीही कसून चौकशी केली जात आहे.
Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड
अशोक खरातविरोधातील कारवाई आता आणखी तीव्र झाली असून, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) त्यांना ताब्यात घेतले आहे. महिलांचे कथित लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि मनी लाँड्रिंगसंदर्भातील प्रकरणांमध्ये आता मुंबई येथील ईडी कार्यालयाकडून त्यांची सखोल चौकशी केली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने नाशिकमधील आवश्यक न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून अशोक खरात यांना अधिकृतपणे ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना नाशिकहून मुंबईकडे रवाना करण्यात आले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना नाशिक मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईत नेल्यानंतर अशोक खरात यांना पीएमएलए न्यायालयासमोर हजर केले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर ईडीकडून त्यांच्या कथित बेनामी मालमत्ता, आर्थिक व्यवहार आणि निधीच्या स्रोतांची चौकशी केली जाणार आहे.






