काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव ज्ञानेश्वर वाकडे असे आहे. गेल्या एक वर्षांपासून लातूर जवळील हायवेवर एका हॉटेलमध्ये ‘कूक’ म्हणून काम करत होता. शनिवारी (११ जुलै) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर हा अंबाजोगाईवरून घाटनांदूरच्या दिशेने स्वतःच्या बाईकवरून जात होता. या प्रवासादरम्यान त्याच्यासोबत त्याचे इतर दोन मित्रही मोटारसायकलवर स्वार होते. ते घटनांदूर येथील साठे चौकात पोहोचले असता, तिथे उपस्थित असलेल्या काही जणांसोबत त्याची कोणत्यातरी कारणावरून बाचाबाची झाली. हा वाद इतका विकोपाला गेला आणि आरोपींनी आपल्याजवळील धारदार चाकू काढून ज्ञानेश्वरवर एकापाठोपाठ एक सपासप वार केले. यात ज्ञानेश्वरचा घटनास्थळीच जागीच मृत्यू झाला.
एक मित्र बचावले आणि…
यावेळी ज्ञानेश्वरसोबत असलेल्या दोन मित्रांपैकी एकाने प्रसंगावधान राखले. त्याने तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला त्यामुळे तो या जीवघेण्या हल्ल्यातून सुदैवाने बचावला आहे. मात्र, त्यांचा दुसरा मित्र या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून मृत ज्ञानेश्वरचा मृतदेहही शवविच्छेदनासाठी याच रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.
आमच्या पाहुण्याला कामावर का नेतोस? म्हणत कात्रीने दात पाडले, डोकं फोडले आणि…
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात किरकोळ कारणावरून मुकादमावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मजुराला कामावर घेऊन जात असल्याच्या कारणावरून झालेला वाद इतका विकोपाला गेला की आरोपीने मुकादमाला कात्रीने मारहाण केली, त्याचे दात पाडले आणि जमिनीवर आपटून गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Ans: ज्ञानेश्वर उत्तरेश्वर वाकडे.
Ans: घाटनांदूर, ता. अंबाजोगाई, जि. बीड.
Ans: एक मित्र गंभीर जखमी झाला, तर दुसऱ्याने पळ काढून जीव वाचवला.






