काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलीचे शेजारच्या गावातील रामू गुर्जर नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. 28 मे रोजी रामूने तिला फूस लावून पळवून नेले आणि ग्वाल्हेरला आणले. रामूचा मित्र अरुण हा त्याच्या संपूर्ण कटात सामील होता. मात्र पुढे तिच्या सोबत काय घडणार आहे याची तिने कल्पना ही केली नसेल. ज्या व्यक्तीवर तिने प्रेम केलं, ज्या व्यक्तीवर तिने विश्वास ठेवला त्याच व्यक्तीने तिचा विश्वासघात केला.
रामू आणि अरुणने या दोन्ही आरोपी पीडित मुलीला ग्वाल्हेरच्या जनकगंज भागातील एका निर्जन टेकडीवर घेऊन गेले. त्या ठिकाणी या दोघांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यांनतर रामूने अरुणकडे 50,000 रुपयांना विकण्याचा सौदा केला. जेव्हा पीडित मुलीला या घृणास्पद सौद्याची माहिती मिळाली आणि तिने याला कडाडून विरोध केला, तेव्हा रामू आणि अरुणने तिचा गळा आवळून हत्या केली. एवढेच नाही तर दुसऱ्या दिवशी पुरावा मिटवण्याचा उद्देशाने त्यांनी मृतदेहावर पेट्रोल ओतून तो पेटवून दिला. मात्र, मृतदेह पूर्णपणे जळाला नाही आणि आरोपी अर्धवट जळालेला मृतदेह तसाच सोडून तिथून पसार झाले.
आरोपी अटकेत
मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेतली. ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवत रामूवर संशय व्यक्त केला होता. या संशयाच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत रामूला ताब्यात घेतले आणि त्याची कडक चौकशी केली. तेव्हा त्याने केलेल्या घृणास्पद कृत्याची कबुली दिली. पोलिसांनी मुख्य आरोपी रामू गुर्जर, अरुण आणि गौरव कुशवाहा यांना अटक केली आहे. टेकडीवरून पिडीतेचा अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतल शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Ans: मुख्य आरोपी रामू गुर्जर हा पीडित मुलीचा प्रियकर होता.
Ans: आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहावर पेट्रोल टाकून तो जाळण्याचा प्रयत्न केला.
Ans: मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी तक्रार केली आणि संशयावरून पोलिसांनी रामूची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.






