(फोटो सौजन्य: istock)
तामिळनाडूतील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प हा भारतातील सातपैकी सर्वात मोठा प्रकल्प आहे. देशाच्या अणुऊर्जा क्षमतेचा विस्तार करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेतील हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या प्रकल्पाच्या कंत्राटदारांपैकी एक असलेल्या अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपने एका निवेदनात मान्य केले आहे की, त्यांच्या डेटावर अंशतः सायबर हल्ला झाला आहे. हा डेटा ‘योटा’ या थर्ड पार्टी भारतीय डेटा सेंटर सेवा प्रदात्याच्या सव्र्व्हरवर होस्ट केलेला होता. रिलायन्सने या घटनेची माहिती सरकारला दिल्याचे सांगितले, मात्र नेमका कोणत्या प्रकारचा डेटा लीक झाला आहे, याचा खुलासा केलेला नाही.
अण्वस्त्र सुरक्षेवर काम करणाऱ्या आणि सरकारांना सल्ला देणाऱ्या ‘न्यूक्लियर थ्रेट इनिशिएटिव्ह’चे वरिष्ठ संचालक निकोलस रोथ यांच्या मते, या डेटा लोकमुळे अणू प्रकल्पाच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. तसेच, ही घटना भारतात हकिंगच्या घटना किती प्रमाणात वाढल्या आहेत आणि अनेक कंपन्या अद्यापही अशा धोक्यांचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सक्षम नाहीत, हे दर्शवते.
खंडणी मागितल्याची शक्यता
रिलायन्स ग्रुपची उपकंपनी असलेल्या ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर ‘ला २०१८ मध्ये या अणू प्रकल्पाच्या युनिट ३ आणि युनिट ४ व्या पायाभूत सुविधा उभारण्याचे कंत्राट मिळाले होते. हे दोन्ही युनिट्स सध्या निर्माणाधीन असून २०२७पर्यंत ते कार्यान्वित होण्याची शक्यता आहे, ज्यातून एकूण २,००० मेगावॅट विजेची निर्मिती होईल. ‘वर्ल्ड लीक्स’ हा एक कुख्यात रॅन्समवेअर ग्रुप असून यापूर्वी त्यांनी ‘नायकी’ आणि ‘टाटा ग्रुप’लाही लक्ष्य केले आहे. सामान्यतः कंपन्यांनी खंडणी देण्यास नकार दिल्यास हा ग्रुप त्यांचा डेटा आपल्या डार्क वेब साईटवर प्रसिद्ध करतो, जी केवळ ‘टॉर’ सारख्या विशेष ब्राउझरद्वारेच वापरता येते.
‘मी मरणार नाही..’; व्हिडीओ जारी करत Sonam Wangchuk यांचे देशाला आवाहन
डेटा लीकची देशात महामारी
सुरक्षा संशोधकांच्या मते, या फाईल्स चुकीच्या हातात पडल्या, तर त्यांचा वापर प्रकल्पाच्या सपोर्ट सिस्टीमचा नकाशा तयार करण्यासाठी, पुरवठादारांची ओळख पटवण्यासाठी आणि सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी शोधण्यासाठी केला जाऊ शकतो. सायबर सुरक्षा कंपनी ‘सर्फशार्क’च्या अहवालानुसार, डेटा लीकच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे गेल्या वर्षी २.८९ कोटी खात्यांवर डल्ला मारण्यात आला होता. या यादीत केवळ अमेरिका आणि फ्रान्स हे देश भारताच्या पुढे आहेत.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)






