काय नेमकं प्रकरण?
मंगळवारी घराचे प्रमुख ७० वर्षीय रवींद्र कुमार वैश्य, त्यांची ६५ वर्षीय पत्नी अनिता आणि ४५ वर्षीय मुलगी मीनाक्षी या तिघांचे मृतदेह घरात आढळून आले होते. तर घरातील ४० वर्षीय मुलगा अभिषेक हा बेपत्ता होता. मात्र पोलीस तपास केले असता उशिरा संध्याकाळी त्यांचा देखील मृतदेह आढळून आला. मृत अभिषेकचा मृतदेह या कुटुंबाच्या मालकीच्याच एका दुकानात आढळून आला. वीरेंद्र कुमार वैश्य यांच्याच एका नातेवाईकाने या मृतदेहाची ओळख पटवली आहे. अभिषेकचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला असून तो कुजलेल्या अवस्थेत तसेच फुगलेला होता. पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.
Solapur Crime: मी तुला आझाद करतोय…; पत्नीसाठी शेवटचा व्हिडीओ बनवत 38 वर्षीय पतीची आत्महत्या
भिंतीवर काय?
पोलिसांनी संपूर्ण घराची झडती घेतली तेव्हा घराच्या भिंतीवर आणि एका बोर्डावर ‘बंटी-बबली’ आणि ‘सुनेने मारले आहे’ असे लिहिलेले आढळून आले. मृतदेहांच्या अंगावरील जखमांच्या खुणा आढळून आले. मृतदेहांची अवस्था पाहता एखाद्या जड वस्तूने डोक्यावर किंवा शरीरावर प्रहार करून ही हत्या करण्यात आल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी आता हा आत्महत्येचा नसून हत्येचा गुन्हा असावा या दृष्टीने तपास तीव्र केला आहे. पोलिसांनी घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांचे फील्ड युनिट, डॉग स्क्वाड आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळावरून पुरावे गोळा करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत.
दुसरा मुलगा तुरुंगात
प्राथमिक तपासात समोर आले आहे की, मृत वीरेंद्र कुमार वैश्य यांचा दुसरा मुलगा अश्विनी वैश्य हा सध्या एका जुन्या फसवणुकीच्या गुन्ह्यात कौशांबी तुरुंगात शिक्षा भोगत आहे. पोलिसांकडून आता अश्विनीच्या पत्नीबद्दल (सुनेबद्दल) अधिक माहिती गोळा केली जात आहे. अश्विनी आणि मृत अभिषेक हे दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते आणि त्यांचे वडिलांशी सतत वाद होत असत. विशेष म्हणजे, ज्या घरात आणि दुकानात हे मृतदेह सापडले, त्यांना बाहेरून कुलूप लावलेले होते. पोलिसांनी हे कुलूप तोडूनच आत प्रवेश केला होता. आता या प्रकरणात काय नेमकं समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
Ans: एकाच कुटुंबातील चार सदस्य मृत अवस्थेत आढळले.
Ans: भिंतीवर ‘सुनेने मारले आहे’ आणि ‘बंटी-बबली’ असे लिहिलेले आढळले.
Ans: पोलिस या प्रकरणाकडे हत्येच्या संशयातून तपास करत आहेत.






