काय नेमकं घडलं?
म्हसळा तालुक्यातील वरवटणे बौद्धवाडी इथं एक 15 वर्षीय शाळकरी मुलगी राहत होती. तिची दोन महिन्यापूर्वी एका मुला सोबत फेसबूकवर ओळख झाली. याच ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. दोघेही फेसबुकवर सतत बोलत असे. शुक्रवारी रात्री ही मुलगी त्या मुलासोबत बोलत होती. रात्री उशिरा मुलगी फोनवर बोलते हे तिच्या घरच्यांना लक्षात आले. यात तिची चोरी पकडली गेली होती. हे तिला समजले. आता पुढे काय होणार, घरचे आपल्याला ओरडणार असे तिला वाटतं होते.
Nashik Crime: सोशल मीडियावरून वाद; पतीने पत्नीला गाडीतून फेकून दिलं, नंतर पत्नीवर कार चढवून…
भीतीने उचलले टोकाचे पाऊल
याच भीतीने तिने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. तिने घरात असलेल्या वाश्याला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. हा दृश्य घरच्यांना दिसताच त्यांच्या पाय खालची वाळू सरकली. त्यांनी तात्काळ मुलीला खाली उतरवले. त्यांनतर उपचारासाठी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिला तपासले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
परिसरात खळबळ
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. म्हसळा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आता पुन्हा एकदा मोबाईल मुलांच्या हातात द्यावे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Ans: घरच्यांना फेसबुकवर बोलताना कळल्याने ती घाबरली आणि टोकाचा निर्णय घेतला.
Ans: रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात.
Ans: आकस्मित मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू आहे.






