मोहिमेदरम्यान पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून ८६५ किलो गोमांस जप्त केले. सुमारे ६ लाख ७५ हजार रुपये किमतीचे हे गोमांस पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट करण्यात आले. दरम्यान, कतलीसाठी डांबून ठेवलेल्या १२ गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली. तसेच अवैध वाहतुकीदरम्यान आणखी ३९ जनावरे ताब्यात घेत सुरक्षितपणे गोशाळेत जमा करण्यात आली. या दोन्ही कारवायांत एकूण ११ वाहने जप्त करण्यात आली असून त्यामध्ये तीन वाहने गोमांस वाहतुकीतील तर आठ वाहने जनावरांच्या वाहतुकीतील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जप्त करण्यात आलेल्या सर्व वाहनांचे परवाने तसेच चालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.
संतापजनक! बस स्टँडवर तरुणीसमोर माथेफिरूचे अश्लील कृत्य; तरुणीने व्हिडीओ बनवला अन्…
विशेष मोहिमेत पोलिसांनी एकूण ५१ गोवंश जनावरांची सुटका केली. कत्तलखान्यातून १२ तर अवैध वाहतुकीतून ३९ जनावरे मुक्त करण्यात आली. सर्व जनावरांना पुढील संगोपनासाठी अधिकृत गोशाळेत पाठविण्यात आले आहे.
जिल्ह्यात कुठेही अवैध गोवंश कत्तल, गोमांस विक्री किंवा जनावरांची बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तातडीने डायल ११२ किंवा स्थानिक पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले. r






