नवी मुंबई: एका महिलेचा पाठलाग करत महिलेला गाडीत बसवले आणि बंदुकीच्या धाकावर तिला लैंगिक संबंद ठेवण्याची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना ७ जून रोजी सायंकाळी नवी मुंबईतील तळोजा परिसरात घडला आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परंतु आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही आहे. आरोपीचं नाव कुंदन नेटके असे आहे.
Kolhapur Crime: धक्कादायक! विद्येच्या मंदिरात शिक्षकच ठरला भक्षक; विद्यार्थिनीची छेड काढली अन्…
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सात जून रोजी सायंकाळी साडेचार वाजता घडली. पीडित महिला मेट्रो स्टेशनकडे चालत जात होती. त्याचवेळी आरोपी कुंदन नेटके यांनी तिचा पाठलाग करत गाडी थांबवली. मला एक बोलायचं आहे असं म्हणत त्याने पीडितेला गाडीत बसण्यास भाग पाडलं. त्यानंतर गाडीमध्ये त्याने पीसीतेनें लैंगिक संबंधाची मागणी केली. तिने विरोध करताच आरोपीने बंदूक दाखवत धमकावलं. या घटनेननंतर पीडित महिलेने कशीबशी आपली सिट्का करत थेट तळोजा पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेअंतर्गत कलम 4 (लैंगिक छळ ) आणि कलम 3(2) अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद केली आहे .
पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे गोळा करत आहे. आरोपीला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नवी मुंबई/सावन वैश्य : नवी मुंबईतील खळबळजनक घटना समोर येत आहे. गेल्या 14 वर्षांपूर्वी एरा क्षुल्लक कारणावरुन एका व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या करणारा आरोपी आता गजाआड झाला आहे. आजिनाथ त्र्यंबक दौंड याची 14 वर्षांपूर्वी हत्या केली होती. फक्त एक हजार रुपयांच्या देवाण-घेवाणीच्या वादातून लक्ष्मण गंगाधर काकडे यांनी आजिनाथ दौंड यांची धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून हत्या केली होती. गुन्हे शाखेने केंद्र शासनाच्या नोटग्रीड पोर्टलच्या मदतीने 14 वर्षांपासून फरार असलेला आरोपी लक्ष्मण गंगाधर काकडे याला अटक केली आहे.
मयत अजिनाथ दौंड व आरोपी लक्ष्मण काकडे 15 वर्षांपूर्वी एका ट्रकवर चालक व क्लीनर चे काम करत होते. त्यावेळी दोघांमध्ये एक हजार रुपयांची देवाण-घेवाण झाली होती. याच देवाणघेवाणीवरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, लक्ष्मण काकडे याने आजिनाथ दौंड यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीतील सेक्टर 19 मध्ये हत्या केली होती. याबाबत एपीएमसी पोलिसांनी आरोपी विरोधात सीआरपीसी 299 अन्वये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट; ज्येष्ठ महिलेचे दागिने लंपास