Bihar Crime: गर्भवती वहिनीचा जबरदस्तीला विरोध, दीराने गळा आवळून केली हत्या; बिहार येथील घटना
काय घडलं नेमकं?
८ एप्रिल रोजी अमनचा मृतदेह एका पडक्या घरात आदळून आला होता. अमन हा मलूकपूरचा रहिवासी आहे. तो एका सलूनमध्ये काम करत होता. ८ एप्रिल रोजी त्याचा मृतदेह सापडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्याच्या शरीरावर आणि चेहऱ्यावर जखमेच्या २१ खुन्या होत्या. ज्यावरून त्याची हत्या अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. अमनच्या कुटुंबीयांनी त्याच्या तीन मित्रांवर संशय व्यक्त केला होता, मात्र पोलिसांच्या तपासात ते निर्दोष आढळले.
कशी केली आरोपींना अटक
पोलिसांनी तांत्रिक तपासावर भर देत परिसरातील CCTV फुटेज आणि कॉल डिटेल्सची कसून चौकशी केली. तेव्हा या तपासात जखीरा येथील १९ वर्षीय समद मूसा याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी सापळा रचून समदला भाजी मंडई परिसरातून अटक केली. चौकशीदरम्यान समदने आपला गुन्हा कबूल केला असून हत्येमागील कारण ऐकून पोलीसही थक्क झाले. सध्या आरोपीची रवानगी तुरुंगात करण्यात आली असून पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.
का केली हत्या?
समद आणि अमन यांची मैत्री सहा महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती. समद जेव्हा जेव्हा इन्स्टाग्रामवर रील पोस्ट करायचा, तेव्हा अमन त्यावर अर्वाच्य आणि आक्षेपार्ह कमेंट्स करायचा. या कारणावरून त्यांच्यात फोनवर अनेकदा भांडणे आणि शिवीगाळ झाली होती. अमनच्या या वागणुकीचा राग मनात धरून समदने त्याला कायमचे संपवण्याचा निर्णय घेतला.
कशी केली हत्या?
७ एप्रिल रोजी समदने अमनला भेटण्यासाठी बोलावले आणि दोघेही बोलत बोलत रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या निर्जन ठिकाणी गेले. समदने अमनला धक्का देऊन खाली पाडले आणि जवळच पडलेल्या विटांनी त्याच्या डोक्यावर व चेहऱ्यावर सपासप वार केले. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मृतदेह ओढत नेऊन एका पडक्या खोलीत लपवून ठेवला. अमनचा मृत्यू झाला आहे याची खात्री करण्यासाठी त्याने पुन्हा एकदा त्याच्यावर वार केले. पोलिसांनी समदच्या सांगण्यावरून हत्येत वापरलेली रक्ताने माखलेली वीट जप्त केली आहे.
Ans: इंस्टाग्रामवरील आक्षेपार्ह कमेंटमुळे वाद होऊन हत्या झाली.
Ans: आरोपीने विटांनी डोक्यावर वार करून खून केला.
Ans: आरोपीला अटक करून पुरावे जप्त केले आणि तपास सुरू आहे.






