जम्मू-काश्मीरमध्ये बस दरीत कोसळली (फोटो- istockphoto )
पूंछ: जम्मू काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. एक प्रवासी बसचे नियंत्रण सुटल्याने सांगरा येथील मानकोट भागात एका दरीत कोसळली आहे. ही बस इतक्या वेगाने दरीत कोसळली की, दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 40 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
बसचे नियंत्रण सुटल्याने बस अचानक दरीत कोसळली. यामध्ये 2 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 40 प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तत्काळ उपचारांसाठी रूग्णालयात नेण्यात आले आहे. या ठिकाणी प्राथमिक उपचार केलयावेर त्यांना राजौरी येथे हलवण्यात आले आहे.
उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, बस घनी गावातून मेंढर या ठिकाणी जात होती. बसचा अपघात सकाळी 9 ते 9.30 च्या सुमारास झाला. बसचा वेग जास्त असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. वेग जास्त असल्याने अनियंत्रित होऊन बस दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, सेना आणि सीआरपीएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
वऱ्हाड्यांची स्कॉर्पिओ कार थेट ट्रॅक्टरला जाऊन धडकली
बिहारमधील कटिहार येथे सोमवारी एक भीषण अपघात घडला आहे. यात लग्नातील ८ पाहुण्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना पोठिया पोलीस स्टेशन परिसरात घडली असून चांदपूर येथील हनुमान मंदिराजवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला स्कॉर्पिओकार धडकल्याने हा भीषण अपघात झालाय. ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर २ जण गंभीर जखमी आहे. जखमींना प्राथमिक उपचारानंतर जीएमसीएच (पूर्णिया) येथे रेफर करण्यात आलंय. हे सर्व १० जण एकाच स्कॉर्पिओमधून प्रवास करत असताना हा अपघात झाला. तर घटनेतील सर्व मृत पूर्णियाच्या बधरा कोठी येथील धिबरा बाजारचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघटनानंतर परिसरातील लोकांची गर्दी जमली आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. कटिहारच्या कुर्सेला पोलीस स्टेशन हद्दीतील कोशीकपूर येथे लग्नाचा कार्यक्रम होता. त्यासाठी वरात जात असताना वाटेत हा अनर्थ घडला.चांदपूर चौकात मक्याचा ढीग पाहून चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्यानंतर स्कॉर्पिओ थेट मक्याने भरलेल्या ट्रॅक्टरला जाऊन धडकली. या भीषण अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झालाय.
या अपघातात २ जण जखमी झाले आहे. जखमींचे नाव उदय कुमार आणि अभिषेक कुमार असल्याचे सांगितले जात आहे. दोघेही सुमारे २५-२६ वर्षांचे असल्याची माहिती पुढे आली आहे. मृतांचे नाव आणि अधिक कोणतीही माहिती समोर आलेली नाही आहे. मृतांची माहिती गोळा केली जात आहे. मात्र अपघाताच्या या बातमीनंतर लग्नाच्या आनंदात शोककळा पसरली आहे.