धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार; अभिजीत दिपके यांचा केंद्राला इशारा
अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत जंतर-मंतरवरील आमचे शांततापूर्ण आंदोलन सुरूच राहील.” त्यांनी आंदोलनाच्या पुढील टप्प्याची भूमिका स्पष्ट करत सरकारवर दबाव कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
दिपके यांनी आपल्या संदेशात सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचे कौतुकही केले. “सोनम सर यांनी 26 दिवसांनंतर आपले उपोषण मागे घेतले, याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. सर, तुमच्या धैर्यासाठी आणि त्यागासाठी मनःपूर्वक धन्यवाद,” असे त्यांनी म्हटले.
NEET पेपर लीक प्रकरणानंतर देशभरात शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर विविध संघटना आणि कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारकडे ठोस कारवाईची मागणी केली जात आहे. अभिजीत दिपके यांच्या मते, केवळ आश्वासनांवर समाधान मानता येणार नाही. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर जबाबदारी निश्चित होऊन केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय कॉकरोच जनता पार्टीने कायम ठेवला आहे.
अभिजीत दीपक यांनी पुढे सांगितले की, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देईपर्यंत जंतर मंतर येथील कॉकरोच जनता पक्षाचे शांततापूर्ण आंदोलन सुरूच राहील. प्रवक्ते सौरभ दास यांनीही आंदोलन सुरूच राहणार असल्याची पुष्टी केली. कॉकरोच जनता पक्षाने आज, २४ जुलै रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे.
कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनाबाबत मोदी सरकार पूर्णपणे सतर्क झाले आहे. दरम्यान, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, हे अभिजीत दीपक यांनीही स्पष्ट केले आहे. हे देशव्यापी आंदोलन आज, २४ जुलै रोजी होणार आहे. सीजेपीने देशभरातील विद्यार्थ्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
अलीकडेच सीजेपीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. अनेक समाजकंटकांनीही आंदोलनात प्रवेश करून मोठा गोंधळ घातला. पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि पलीकडूनही दगडफेक झाली. यात अनेक पोलीस गंभीर जखमी झाले. मात्र, कॉकरोच पार्टीच्या लोकांनी शांततेचे आवाहन केले आहे.






