देशात मुसळधार पावसाचा इशारा (फोटो- istockphoto)
देशातील अनेक राज्यांना पावसाचा इशारा
हिंदी महासागरात तयार झालाय कमी दाबाचा पट्टा
हवामान विभागाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Weather Update: हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे. दक्षिण आणि पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे दक्षिण भारतातील अनेक राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडू, केरळ, आज व उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
हवामान विभागाने उत्तर भारतातील अनेक राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. दोन ते चर डिग्री तापमान वाढण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. दक्षिण तामिळनाडू आणि दक्षिण केरळमध्ये तूफान पाऊस होण्याची वर्तवण्यात आली आहे.
दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या ठिकाणी वाऱ्याचा वेग देखील 40 ते 50 किमी प्रतीतास इतका राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Weather: भारतात पुन्हा पावसाची शक्यता! वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तापमानाचा ‘यू’टर्न
महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. उकाडा वाढल्यास कदाचित पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. अनेक ठिकाणी हवामान ढगाळ राहू शकते. तसेच काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. राज्यात थंडी कमी होऊन उन्हाळा सुरू झाल्यासारखे वाटत असताना काही ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
तामिळनाडू आणि केरळमध्ये देखील पाऊस होऊ शकतो. दक्षिण भारतात काही दिवस हवेचा वेग जास्त राहण्याची शक्यता आहे. पश्चिमेकडील काही राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. हवामान विभागाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
भारतात पुन्हा पावसाची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक भागांत तापमान वाढत असल्याचे चित्र असतानाच मंगळवारी (17 फेब्रुवारी) अचानक गारवा जाणवू लागला. हवामानातील हा बदल सक्रिय झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. या पश्चिमी विक्षोभामुळे पाकिस्तान आणि उत्तर-पश्चिम भारताच्या काही भागांमध्ये बुधवारपर्यंत पावसाची क्षेत्रे निर्माण होणार असल्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता दरम्यान, दक्षिण-मध्य बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे श्रीलंकेत रविवारपर्यंत पावसाची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. याच प्रणालीचा परिणाम म्हणून शुक्रवारपासून रविवारदरम्यान तामिळनाडू, पुडुचेरी आणि केरळमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.






