अर्थसंकल्प पाहून Shashi Tharoor भडकले; केंद्र सरकारवर प्रश्नांचा प्रहार (Photo Credit - X)
अर्थसंकल्पीय भाषण संपल्यानंतर शशी थरूर यांनी सुरुवातीला सावध प्रतिक्रिया दिली होती. भाषणात माहिती खूपच कमी असल्याने आणि आकडेवारी स्पष्ट नसल्याने आपण गोंधळात पडलो असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, अर्थसंकल्पाचे सविस्तर आकलन केल्यानंतर त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एकामागोमाग एक ७ पोस्ट्स करत केंद्र सरकारला धारेवर धरले.
The #UnionBudget2026 calls for a new hashtag: #InvisibleKerala! https://t.co/2khNwCWwHT — Shashi Tharoor (@ShashiTharoor) February 1, 2026
Union Budget 2026: ‘रविवार’चा अर्थसंकल्प गुंतवणूकदारांसाठी ठरला काळा दिवस; सोने-चांदीही कोसळली
१. एम्स (AIIMS) बाबत केंद्राचे मौन: “देशभरात २२ नवीन एम्स संस्था स्थापन झाल्या, पण आरोग्यसेवेत देशात आघाडीवर असलेल्या केरळला पुन्हा एकदा वगळण्यात आले, हे धक्कादायक आहे,” असे थरूर यांनी नमूद केले.
२. हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरमधून केरळ गायब: देशात ७ नवीन हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा झाली असली तरी त्यात केरळचा समावेश नाही. “आम्हाला नवीन संक्षिप्त शब्दांची नाही, तर खऱ्या गाड्यांची गरज आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
३. विझिंजम बंदराकडे दुर्लक्ष: विझिंजम बंदर ही भारताची सागरी संपत्ती आहे, तरीही त्याच्या कनेक्टिव्हिटीसाठी पुरेसा निधी देण्यात आलेला नाही. याला राष्ट्रीय प्राधान्य देण्याऐवी केवळ केरळचा स्थानिक मुद्दा म्हणून पाहिले जात असल्याची टीका त्यांनी केली.
४. आयुर्वेद संस्थेचे आश्वासन हवेत: अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेबाबत कोणतेही ठोस पाऊल न उचलल्याने तिरुवनंतपुरमची वैद्यकीय आणि संशोधन क्षेत्रातील क्षमता पद्धतशीरपणे दडपली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
५. कुशल कामगारांचे योगदान विसरले: “परकीय चलन साठ्यात आणि कुशल कामगार पुरवण्यात केरळचे योगदान मोठे आहे. मात्र, केंद्राच्या आर्थिक दृष्टिकोनातून केरळ पूर्णपणे अनुपस्थित दिसत आहे,” असे थरूर म्हणाले.
६. “अदृश्य केरळ बजेट” हाच संदेश: निवडणुकीच्या वर्षात केरळचा उल्लेख अर्थसंकल्पात नसणे, हाच केंद्र सरकारचा राज्यातील जनतेला दिलेला संदेश आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
७. स्थानिक नेतृत्वाचे अपयश: थरूर यांनी मल्याळी जनतेच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित करत म्हटले की, “केरळला अशा खऱ्या नेतृत्वाची गरज आहे जे दिल्लीत मल्याळी लोकांचा आदर मिळवेल आणि स्थानिक पातळीवर विकास करेल. सध्या केरळमध्ये या दोन्ही गोष्टींचा अभाव आहे.”






