(फोटो- टीम नवराष्ट्र)
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण रंगले आहे. नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याने गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेमुळे मला कधीही अटक होऊ शकते असा मोठा दावा शरद पवार गटाचे नेते व आमदार अनिल देशमुख यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना एकच उधाण आले आहे. यावर आता भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
ओ अनिलबाबूऽऽऽऽऽ. 4 वर्षांपूर्वीची घटना कुणीही उकरुन काढली नाही, ते तुमचे कर्म आहे. सारे पुरावे विधानसभेच्या रेकॉर्डवर आहेत.
माध्यमांकडेही त्याचे व्हीडिओ आहेत. ज्या अधिकार्यावर तुम्ही दबाव टाकला, त्या अधिकार्यानेच जबाब दिला आहे.. कर्म तुम्ही कराल आणि दोष आमच्या नेत्यांवर टाकाल, हे चालणार नाही. सरकारी वकील कट रचतो,गृहमंत्री एसपींवर दबाव टाकतात,त्याचे स्टींग सभागृहात येते, सीबीआय चौकशीचे आदेश हायकोर्ट देते आणि तुम्ही देवेंद्रजी फडणवीसांवर आरोप करणार? संवैधानिक प्रक्रियेचा आणखी किती अपमान करणार..? त्यापेक्षा गिरीश महाजन तुम्हाला भेटले तेव्हा तुम्ही कुणाचा दबाव आहे आणि म्हणून मला खोटा गुन्हा दाखल करावाच लागेल हे सांगितले होते हे एकदा सांगून टाका. आहे हिंमत….
ओ अनिलबाबूऽऽऽऽऽ @AnilDeshmukhNCP
4 वर्षांपूर्वीची घटना कुणीही उकरुन काढली नाही, ते तुमचे कर्म आहे…
सारे पुरावे विधानसभेच्या रेकॉर्डवर आहेत.
माध्यमांकडेही त्याचे व्हीडिओ आहेत.
ज्या अधिकार्यावर तुम्ही दबाव टाकला, त्या अधिकार्यानेच जबाब दिला आहे..कर्म तुम्ही कराल आणि दोष… https://t.co/IuDs2gx9aI
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 10, 2024
हेही वाचा: ‘देवेंद्र फडणवीसांच्या कृपेने मला कधीही अटक होऊ शकते’; बड्या नेत्यांचा खळबळजनक दावा
अनिल देशमुखांचे ट्विट काय होते?
देवेंद्र फडणवीस यांनी 4 वर्षा पुर्वीची घटना उकरुण काढीत माझ्या विरुध्द दिल्लीच्या मदतीने CBI FIR दाखल केली आहे. 4 वर्षापुर्वी मी गृहमंत्री असतांना जळगावच्या एका घटनेमध्ये भाजपाचे नेते गिरीष महाराज यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जळगावच्या पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकला होता, हा माझ्यावर आरोप आहे. माझ्या माहितीनुसार माझ्यावर रेड टाकुन मला अटक करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करीत आहेत.ज्या देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीच्या मदतीने ED-CBI ला हाताशी धरुण महाराष्ट्राचे राजकारण अतिशय खालच्या स्तरावर आणले त्यांना सांगु ईच्छीतो की, देवेंद्र फडणवीस मी माझ्या अटकेची वाट पाहत आहे.
महाविकास आघाडीचे सरकार असताना गृहमंत्री असणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गिरीश महाजन यांच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दवाब टाकल्याचा आरोप करत सीबीआयने देशमुखांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर देशमुखांची ट्विट केले होते.
हेही वाचा: CBI कडून देशमुखांविरुद्ध ‘या’ प्रकरणात गुन्हा दाखल; माजी गृहमंत्री म्हणाले, फडणवीसांकडून…
”धन्यवाद…देवेंद्रजी फडणवीस. माझ्यावर #CBI कडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे. जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले आहे. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता – न डगमगता मी #BJP च्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूनगाठ बांधली आहे. महाराष्ट्रात फडणवीसांकडून किती खालच्या पातळीचे आणि विकृत मानसिकतेचे घाणेरडे राजकारण सुरू आहे ते जनतेने बघावे. लोकसभा निवडणुकीत या कारस्थानी नेतृत्वाला जनतेने जागा दाखवून दिली आहे, आता महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाट बघत आहे !”, असे ट्विट देशमुखांची केले होते.