नवी दिल्ली: अलीकडे काही दिवसात देशात वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे (India Corona Update) देशाची चिंता वाढत असताना गेल्या 24 तासांत देशातील कोरोना रुग्णांमध्ये किंचित घट पाहयला मिळाली. गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या नव्या 3,720 रुग्णांची नोंद करण्यात आली. सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 44,175 वरून वर 40,177 वर गेली आहेत. काल देशात 3,325 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती तर 17 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
#COVID19 | India reports 3,720 new cases and 7,698 recoveries in the last 24 hours; the active caseload stands at 40,177. (Representative image) pic.twitter.com/YCzgpygDX1 — ANI (@ANI) May 3, 2023
गेल्या 24 तासात देशात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील मृतांची एकूण संख्या 5,31,564 वर गेली आहे, ज्यामध्ये केरळमधील सर्वाधिक मृत्यूचा समावेश आहे. गेल्या 24 तासात केरळमधे पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
मंत्रालयाच्या वेबसाइटवर शेअर केलेल्या डेटानुसार, राष्ट्रीय कोविड पॅझिटिव्हीटी रेट 98.73 टक्के नोंदवला गेला आहे. कोरोना रुग्णांचा दैंनदिन पॅाझिटिव्हिटी रेट 2.47 आहे तर, साप्ताहिक पॅाझिटिव्हिटी रेट 3.46 इतका नोंदवण्यात आला आहे. गेल्या 24 तासात 7,698 जणांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली असुन आतापर्यंत कोरोनातुन बरे झालेल्या लोकांची संख्या 4,43,84,955 वर गेली आहे.
[read_also content=”गिनीज बुक रेकॉर्ड धारक सुशील रेड्डीचा पुन्हा नवा विक्रम! इलेक्ट्रिक कारने केला कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत प्रवास, गिनीज बुक रेकॉर्डनं घेतली दखल https://www.navarashtra.com/india/guinness-book-record-holder-sushil-reddy-again-a-new-record-traveled-5000-km-from-kanyakumari-to-kashmir-by-electric-car-recognized-by-guinness-book-of-records-394410/”]
सक्रिय संख्या 3,351 वर घसरली महाराष्ट्रात मंगळवारी 139 नवीन कोरोनाव्हायरस प्रकरणे नोंदली गेली आणि एकूण संख्या 81,66,207 वर पोहोचली, तर राज्यात संसर्गाशी संबंधित एकही मृत्यू झाला नाही, असे आरोग्य विभागाने सांगितले. मृतांची संख्या 1,48,515 वर अपरिवर्तित राहिली. सोमवारी, राज्यात 177 प्रकरणे आणि एक मृत्यूची नोंद झाली. आरोग्य विभागाच्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, कोरोनाव्हायरस संसर्गातून गेल्या 24 तासांत 720 रुग्ण बरे झाले असून त्यांची एकूण संख्या 80,14,341 झाली आहे आणि राज्यात 3,351 सक्रिय प्रकरणे आहेत. (पीटीआय)