(फोटो सौजन्य: Pinterest)
Travel News : ताऱ्यांच जग पाहण्याची संधी, महाराष्ट्रात खुले झालेत नवे टुरिस्ट स्पॉट
जवाईला भेट देणे विशेष का आहे?
जगभरातील बिबटे बहुतेकदा घनदाट जंगलांमध्ये लपून राहतात. पण जवाईमध्ये मोकळ्या ग्रॅनाइटच्या टेकड्यांवर त्यांचे वास्तव आपल्याला पाहायला मिळते. इथे तुम्हाला बिबटे देखील पाहता येतील. मुख्य म्हणजे, इथे बिबटे विनाकारण माणसांवर हल्ला करत नाही ज्यामुळे कोणत्याही भितीशिवाय तुम्हाला जवळून त्यांना पाहता येईल.
जवाई धरण
या ठिकाणाचे मुख्य आकर्षण म्हणजे जवाई धरण. जोधपूरचे महाराजा उम्मेद सिंग यांनी बांधलेले हे धरण पश्चिम राजस्थानमधील सर्वात मोठे धरण आहे. जोधपूर आणि पालीसाठी पाण्याचा मुख्य स्त्रोत असल्यामुळे त्याला मारवाडचे अमृच सरोवर म्हणून ओळखले जाते. या ठिकाणाहून दिसणारे दृश्य अत्यंत सुंदर आहे.
देवगिरी मंदिर
इथे तुम्हाला देवगिरीचे प्राचीन मंदिर देखील पाहायला मिळेल. विशाल खडकाखाली बांधलेले हे मंदिर स्थानिक भक्तीचे केंद्र असून ते देवी चामुंडाला समर्पित आहे. मंदिराच्या पायऱ्यांवर किंवा जवळ बिबटे बसलेले दिसतात पण ते भाविकांना त्रास देत नाहीत.
भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणता?
या ठिकाणाला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी सर्वात उत्तम मानला जातो. कारण या काळात हवामान आल्हाददायक असते. तसेच याकाळात तुम्हाला या परिसरात अनेक प्राणी पाहायला मिळतात.
‘गंगा एक्सप्रेस वे’चा पर्यटनाला किती फायदा होणार? कोणत्या धार्मिक स्थळांना जोडला जाणार हा मार्ग
कसे पोहोचायचे?
जवाईसाठी सर्वात जवळचे विमानतळ उदरपूर (सुमारे १४० किमी) किंवा जोधपूर (सुमारे १६० किमी) आहे. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन मोरिबेडा किंवा फालना आहे. इथून पुढे कॅब करुन जवाईला जाता येते. याशिवाय रेल्वे मार्गानेही जवाईला जाता येते.






