कडाक्याच्या उन्हामुळे घसा सतत कोरडा पडतो? 'या' सायलेंट किलर आजारांची लागण झाल्यानंतर दिसतात गंभीर लक्षणे
वारंवार घसा कोरडा कशामुळे पडतो?
उन्हाळ्यात दिवसभरात किती पाणी प्यावे?
शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर उद्भवणाऱ्या समस्या?
राज्यासह संपूर्ण देशभरात तापमानात सतत काहींना काही बदल होत आहेत. कधी ऊन तर कधी पाऊस पडत असल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. अचानक पडलेल्या पावसामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सगळ्यांचं खूप जास्त तहान लागते. उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायले जाते. पण काहीवेळा शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे घसा कोरडा पडून जातो. कितीही पाणी प्यायले तरीसुद्धा तहान लवकर जात नाही. उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर शरीरातील पाणी आणि आवश्यक क्षार घामावाटे बाहेर पडून जातात. ज्याच्या परिणामामुळे खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा येण्याची शक्यता असते. त्यामुळे कडक ऊन आणि उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नियमित भरपूर पाणी प्यावे. २ ते ३ लिटर पाणी प्यायल्यास शरीर हायड्रेट राहण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य – istock)
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर कडक उन्हात कुठेही जाऊन आल्यानंतर घसा कोरडा पडणे, तहान लागणे, थकल्यासारखे वाटणे, अशक्तपणा, चक्कर येणे इत्यादी समस्या उद्भवतात. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. शरीरात दिसून येणारे हेच छोटे बदल गंभीर आजाराचे कारण ठरतात. उन्हात जास्त वेळ बाहेर फिरून आल्यानंतर थकवा, डोकेदुखी किंवा लघवीमध्ये जळजळ, डिहायड्रेशन होते. शरीराचे संतुलन बिघडल्यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर स्थिती निर्माण होते. चला तर जाणून घेऊया घसा वारंवार कोरडा कशामुळे पडतो.
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये शरीरातील पाण्याची आणि आवश्यक क्षारांची पातळी कमी झाल्यामुळे सगळ्यात आधी तोंड कोरडे पडून जाते. पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे चेहऱ्यावरील ग्लो सुद्धा कमी होऊन जातो. डिहायड्रेशनच्या वाढत्या समस्येकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
जगभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात. रात्रीच्या वेळी झोपल्यानंतर वारंवार तहान लागणे, झोपल्यानंतर घसा कोरडा पडणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावेत. कितीही पाणी प्यायल्यानंतर तहान भागत नसेल तर रक्ताची पातळी चेक करावी.
शरीरासाठी विटामिन बी १२ अतिशय महत्वाचे आहे. पण या विटामिनची पातळी कमी झाल्यानंतर जिभेला कोरडेपणा येणे, तोंडात उष्णतेमुळे मोठे फोड किंवा अल्सर येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. तोंड सुकण्यासोबतच तोंडात जर कोरडेपणा किंवा पांढरा थर वाढत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत आणि विटामिन बी १२ ची पातळी वाढवण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा.
Ans: उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी होते (डिहायड्रेशन), त्यामुळे घसा कोरडा पडतो.
Ans: मधुमेह, थायरॉईड, ऍसिडिटी (GERD) किंवा इतर जीवनशैलीशी संबंधित आजारांचे हे लक्षण असू शकते.
Ans: भरपूर पाणी पिणे, नारळ पाणी, फळांचे सेवन आणि थंड पेय (नैसर्गिक) घेणे फायदेशीर ठरते.






