(फोटो सौजन्य: Pinterest)
प्रत्येक ठिकाणाची ओळख ही त्या ठिकाणच्या नावावरून होत असते. भारतात अनेक गाव वसले आहेत आणि त्यातही बरेच असे गावदेखील आहेत ज्यांचे नाव आपल्या कल्पनेपलीकडचे ठरू शकतात. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा एका विचित्र गावाविषयी माहिती सांगणार आहोत ज्याचे नाव तुम्हाला हसू आणू शकते. हे नाव इतके विचित्र आहे की ते ऐकताच महिलांना शरमेने लाल होऊ लागते. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे गाव उत्तर प्रदेशमध्ये वसले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये अनेक सुंदर गावं आहेत जे आजची जमिनीशी जोडलेले आहेत. येथे प्रत्येक धर्माचे लोक राहतात आणि विविध संस्कृतींचा संगम इथे पाहायला मिळतो. प्रत्येक गावात काही ना काही खास असतेच अशातच उत्तर प्रदेशमध्ये एक असे अनोखे गाव वसले आहे ज्याचे नाव लोकांसाठी एक चर्चेचे विषय ठरले आहे. गावाचे नाव गावासाठी खास आकर्षणाचे कारण ठरले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या गावाचे नक्की असे काय नाव आहे, चला तर मग जाणून घेऊया.
तुम्ही कदाचित हे नाव यापूर्वी कधीही ऐकले नसेल
यूपीमध्ये अशी काही गावे आहेत ज्यांचे नाव तुम्ही कदाचित यापूर्वी कधीही ऐकले नसेल. आज आम्ही तुम्हाला यूपीमधील अशाच एका गावाबद्दल सांगणार आहोत ज्याचे नाव ऐकून महिलांना लाज वाटते. याचे नाव पुरुषांना हसू आणते आणि तर महिलांना लाज हे नाव लाज आणते. त्याचवेळी काहींना या नावाचा अभिमानही आहे. चला हे गाव आणि याला पडलेले नाव याविषयी जरा सविस्तर माहिती जाणून घेऊया.
हे गाव सुलतानपूर जिल्ह्यात आहे
हे गाव उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर जिल्यात वसले आहे. आपण बालमपूर गावाबद्दल बोलत आहोत, जे सुलतानपूरच्या भदैया ब्लॉकमध्ये येते. तथापि, हे गाव केवळ त्याच्या नावामुळेच चर्चेत नाही आणि इथली एक खासियत देखील आहे जी नेहमीच लोकांना या ठिकाणाकडे आकर्षित करत असते. आता बालमपूर हे नाव का हास्यास्पद आहे आणि हे नाव ठेवण्यामागचे कारण काय ते आपण जाणून घेऊया.
गावाचे नाव तीन भावांच्या नावावर ठेवण्यात आले
गावच्या नावामागचा इतिहास फार जुना आहे. फार पूर्वी इथे तीन भाऊ राहत होते. एकाचे नाव पुरण आणि दुसऱ्याचे बालम होते तर तिसऱ्याचे नाव महेश होते. स्वातंत्र्यानंतर ,पुरण ज्या गावात गेला त्याचे नाव पुरणपूर होते. महेश ज्या ठिकाणी गेला त्याचे नाव महेशुआ होते. तर बालम ज्या गावात स्थायिक झाला त्याचे नाव बालमपूर होते. आम्ही तुम्हाला सांगतो की , ‘बालम’ हे नाव महिला आपल्या पतीला म्हणतात. अनेक गावांमध्ये महिला आपल्या पतींना बालम या नावाने हाक मारता. त्यामुळेच महिलांना या गावाचे नाव घेण्यास लाज वाटते. हे नाव घ्यायला महिलांना फार जड जाते. सुरुवातीला पुरुषांनाही या गावाचे नाव घ्यायला जड जायचे मात्र काळानुसार आता सर्वांना याची सवय झाली आहे.