(फोटो सौजन्य: istock)
औद्योगिकीकरण आणि शहरीकरण यामुळे प्रदूषणातही वाढ झाली आहे. बदलत्या हवामानामुळे तापमानात सातत्याने वाढ होत असून श्वसनविकार, अॅलर्जी आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ नोंदवली जात आहे. काही गावांमध्ये साचलेली घाण आणि वाढता डासांचा प्रादुर्भाव यामुळे मलेरिया व डेंग्यूच्या रुग्णांमध्येही वाढ होत असल्याची माहिती स्थानिक डॉक्टरांनी दिली आहे.
रुग्णालयांमध्ये बालरुग्णांची गर्दी वाढल्याचे चित्र
उरण आणि पनवेल तालुक्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांत दररोज मोठ्या संख्येने लहान मुले उपचारासाठी दाखल होत आहेत. विशेषतः पाच वर्षांखालील मुलांमध्ये जुलाब-उलट्या आणि तापाची लक्षणे अधिक प्रमाणात आढळत आहेत. निर्जलीकरणाचा धोका टाळण्यासाठी तातडीने उपचार घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
डॉक्टरांचा सल्ला काय ?
डॉ. सत्या ठाकरे यांनी सांगितले की, “वातावरणातील बदलांमुळे लहान मुलांना सर्दी, ताप, खोकला आणि जुलाब यांचा त्रास होतो. उन्हाळ्यात मुलांना भरपूर पाणी पाजणे अत्यावश्यक आहे. दुपारच्या कडक उन्हात बाहेर जाणे टाळावे. बाहेरच्या उष्ण वातावरणातून आल्यावर लगेच थंड पाणी किंवा थंड पदार्थ देऊ नयेत. स्वच्छता उघड्यावरचे अन्न टाळणे गरजेचे आहे.”
केस होतील चमकदार आणि सॉफ्ट! ‘या’ पद्धतीने केसांवर लावा कोरफड जेल, निर्जीव केसांना मिळेल पोषण
पालकांनी घ्यायची काळजी






