मुंबई म्हटलं की डोळ्यासमोर येते ती गर्दी, ट्रॅफिक आणि धावपळीचे जीवन. मात्र, या गजबजलेल्या शहरातही काही अशी शांत आणि निसर्गरम्य ठिकाणे आहेत, जिथे गेल्यानंतर मनाला वेगळाच निवांतपणा मिळतो. हिरवागार निसर्ग, समुद्रकिनारे, टेकड्या आणि शांत वातावरणामुळे ही ठिकाणे पिकनिक किंवा रिलॅक्ससेशनसाठी बेस्ट पर्याय मानली जातात. तुम्हाला देखील निसर्गाच्या सानिध्यात शांत वेळ घालवायचा असेल तर या सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या.
Skin Care Tips: महागडे प्रोडक्ट नव्हे, तर ‘या’ सवयी देतील नॅचरल ग्लोइंग स्किन; जाणून घ्या
बोरिवलीजवळील गोराई बीच हा शांत अन् सुंदर समुद्रकिनाऱ्यासाठी ओळखला जातो. गर्दीपासून दूर असलेला हा समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही सूर्यास्त पाहण्याचा अनुभव घेऊ शकता. येथे थंड वारा आणि शांत वातावरणामुळे मन शांत होते.
नवी मुंबईतील सागर विहार हे कमी प्रसिद्ध पण सुंदर ठिकाण आहे. वाशी स्टेशन पासून काही अंतरावर असलेले हे ठिकाण मॉर्निंग वॉक, सायकलिंग आणि शांत वेळ घालवण्यासाठी योग्य मानले जाते.
मुंबईपासून काही अंतरावर असलेले कर्नाळा पक्षी अभयारण्य निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग मानले जाते. येथे विविध पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला मिळतात. ट्रेकिंग आणि फोटोग्राफीसाठीही हे ठिकाण प्रसिद्ध आहे. येथे एकदा नक्की जा.
अंधेरीतील गिल्बर्ट हिल हे मुंबईतील अनोखे नैसर्गिक ठिकाण आहे. लाखो वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेली ही टेकडी शहराच्या मध्यभागी असूनही शांततेचा अनुभव देते.
ठाणेजवळील येऊर हिल्स हिरवाई आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. सकाळच्या वॉक, सायकलिंग आणि पावसाळी पर्यटनासाठी हे ठिकाण अनेकांच्या पसंतीस उतरते. धावपळीच्या जीवनात निवांत वेळ घालवण्यासाठी येथे नक्की जा.
इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर वसई किल्ला उत्तम पर्याय आहे. जुन्या वास्तू, हिरवळ आणि समुद्रकिनाऱ्याजवळील दृश्यांमुळे येथे फोटोग्राफीसाठीही अनेक पर्यटक भेट देतात.






