• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Bawankule Has Given A Seven Day Ultimatum To Farmers Regarding Purandar Airport

शेतकऱ्यांनी सात दिवसात निर्णय कळवावा, नाहीतर…; चंद्रशेखर बावनकुळेंचा अल्टिमेटम

शेतकऱ्यांनी सात दिवसात आपला निर्णय सरकारला कळवावा; नाहीतर सरकार आपल्यासमोर प्रस्ताव ठेवेल, असा अल्टिमेटम महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषदेत दिला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 05, 2025 | 06:06 PM
सरकार उलथवण्याची भाषा चीड आणणारी

सरकार उलथवण्याची भाषा चीड आणणारी (संग्रहित फोटो)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : शेतकऱ्यांनी सात दिवसात आपला निर्णय सरकारला कळवावा; नाहीतर सरकार आपल्यासमोर प्रस्ताव ठेवेल, असा अल्टिमेटम महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषदेत दिला. शेतकऱ्यांनी फक्त विमानतळविरोधी भूमिका सोडून यावे आणि मोबदल्यात तुम्हाला काय- काय हवं आहे यासाठी सरकार तुमच्याशी चर्चा करण्यास तयार आहे, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन करण्याकरिता ड्रोन सर्वेक्षण करण्यात येत आहे. मात्र त्या सर्वेक्षणाला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध करून आंदोलन केले. आंदोलन हिंसक झाले. काही अधिकाऱ्यांना देखील मारहाण करण्यात आली. त्यामुळे पोलिसांकडून शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. हे प्रकरण गंभीर होत असल्याचे दिसताच चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन शासनाची भूमिका मांडली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, आमदार विजय शिवतरे, आमदार शरद सोनवणे व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले पुरंदर विमानतळासाठी सुरू असलेल्या ड्रोन सर्वेक्षणा दरम्यान ज्यांनी अधिकाऱ्यांवर हल्ले केले त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. आणि जे शेतकरी व शेतकऱ्यांची मुले निरपराध आहेत त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल.

पुरंदरला विमानतळ झाले तर स्थानिक नागरिकांना याचा शंभर टक्के फायदा होईल. कृषीमाल जगाच्या बाजारपेठांमध्ये जाईल. फक्त पुरंदरचाच नाही, तर पश्चिम महाराष्ट्रासाठी पुरंदरचे विमानतळ खूप महत्त्वाचे आहे असेही महसूलमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. शासनाची भूमिका शेतकऱ्यांच्या हिताची आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी संवाद साधतील

ग्रामसभा घेऊन सात गावांचे निर्णय प्रशासनाला कळवावेत त्या संदर्भात जिल्हाधिकारी सात गावांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधतील. लॉजिस्टिक हब तयार झाले तर पुरंदरचा झपाट्याने विकास होणार आहे. त्याचबरोबर विमानतळ आल्यावर काय फायदे होणार आहेत ही बाजू शेतकऱ्यांना समजून सांगण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

या अगोदरही सात गावांनी विमानतळास तीव्र विरोध दर्शवला आहे. शेतकरी नामदेव आप्पा कुंभार, तुषार झुरंगे या गावातील लोकप्रतिनिधींनी विमानतळात जमिनी देणार नाही असा प्रस्ताव महसूलमंत्र्यांकडे दिला. या संदर्भात शेतकऱ्यांचे प्रस्ताव आल्यानंतर त्यावरती निर्णय घेऊन पुढील कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मी पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बरोबर आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय भूसंपादनाबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही यासाठी मी प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांच्या मुलांवरील गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी बावनकुळे यांच्याकडे केली – आमदार विजय शिवतरे विमानतळासाठी जमीन देण्यास आमचा पूर्ण विरोध आहे. सरकार शेतकऱ्यांवरती अन्याय करत आहे. दबाव तंत्राचा वापर करणे सरकारने थांबवावे. – नामदेव अप्पा कुंभार, शेतकरी

भ्रष्ट अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी

भूमिअभिलेख व जमाबंदी कार्यालयात प्रशासनाचे जे अधिकारी वर्षानुवर्षे एकाच जागेवर ठाण मांडून बसले आहेत त्यांच्या बदली बरोबरच, नियमांमध्येही बदल करण्यात येणार आहेत. ज्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांची एसआयटी चौकशी लावून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे बावनकुळे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. भूमीअभिलेख संदर्भात जे कायदे कालबाह्य झालेले आहेत ते काढून नवीन कायदे तयार करण्यासाठी जमाबंदी आयुक्त आयुक्त सुहास दिवसे पुढील कार्यवाही करणार आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले

Web Title: Bawankule has given a seven day ultimatum to farmers regarding purandar airport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 06:06 PM

Topics:  

  • Chandrasekhar Bawankule
  • Cmomaharasahtra
  • pune news
  • Purandar Airport

संबंधित बातम्या

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
1

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक
2

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
3

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष
4

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

ताज्या बातम्या

पुढे वाचा
विकेंड ट्रीपला जात आहात? मग टेन्शन फ्री सफरसाठी बॅगेत या 5 गोष्टी ठेवायला विसरू नका

विकेंड ट्रीपला जात आहात? मग टेन्शन फ्री सफरसाठी बॅगेत या 5 गोष्टी ठेवायला विसरू नका

आता सरकार परत करणार तुमचे ‘पैसे’, बँकेत रू. 1.84 लाख कोटींची ‘Unclaimed’ रक्कम! अर्थमंत्री सीतारमण यांचा खुलासा

आता सरकार परत करणार तुमचे ‘पैसे’, बँकेत रू. 1.84 लाख कोटींची ‘Unclaimed’ रक्कम! अर्थमंत्री सीतारमण यांचा खुलासा

‘…हम सुधर गए और आप बिगड़ गए!’ पंकज त्रिपाठींना गुरुजी म्हणत रणवीर सिंहने का केली अशी कमेंट?

‘…हम सुधर गए और आप बिगड़ गए!’ पंकज त्रिपाठींना गुरुजी म्हणत रणवीर सिंहने का केली अशी कमेंट?

अरेच्चा! ‘या’ दुचाकी उत्पादक कंपनीने स्वतःचाच रेकॉर्ड तोडला, पहिल्यादाच एका महिन्यात विक्री 1 लाखांच्या पार

अरेच्चा! ‘या’ दुचाकी उत्पादक कंपनीने स्वतःचाच रेकॉर्ड तोडला, पहिल्यादाच एका महिन्यात विक्री 1 लाखांच्या पार

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

शरीराच्या ‘या’ भागात असते सर्वात जास्त घाण, आंघोळीनंतरही राहतात लाखो Bacteria

शरीराच्या ‘या’ भागात असते सर्वात जास्त घाण, आंघोळीनंतरही राहतात लाखो Bacteria

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

व्हिडिओ

पुढे बघा
Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.