मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- सोशल मीडिया)
गुंतवणूक म्हणजे महाराष्ट्र अशी ओळख निर्माण केली जाणार
महाराष्ट्राला जागतिक उत्पादन केंद्र तयार करण्याचे उद्दिष्ट
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सादर केला अर्थसंकल्प
Maharashtra Budget Live 2026: आज राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये विविध घटकांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह अर्थसंकल्प दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्पित केला. तसेच त्यांची आठवण काढताच फडणवीस भावुक झाल्याचे दिसून आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट आहे. गुंतवणूक महाराष्ट्र हा व्यासपीठ आम्ही तयार करत आहोत. यामुळे लाखों रोजगार निर्माण होणार आहेत. 1 कोटींची मुख्यमंत्री मत्स्य योजना केली जाणार आहे. संयुत राष्ट्र संघाने ही वर्ष आंतराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे.”
“राज्याचे नवीन गुंतवणूक व औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आले आहे. इन्वेस्ट महाराष्ट्र जा प्लॅटफॉर्म तयार केला जात आहे. आगामी दोन वर्षात महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरूवात केली जाणार आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 23 हजार किमीचे रस्ते बांधले जाणार आहेत”, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
फडणवीस बजेट मांडताना काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बजेट सादर करताना म्हणाले, “जब हौसला बना लिया ऊँची उड़ान का, फिर देखना फिजूल है कद आसमान का… मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेनमुळे उत्पन्नात वाढ होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था अधिक सक्षम करणार. हायस्पीड ट्रेन दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे मनापासून आभार. प्रगतशील शाश्वत, सर्वसमावेशक, सुशासन हे बजेटचे 4 स्तंभ आहेत. दिवंगत अजित पवारांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे.”
Maharashtra Budget Live: “…फिर देखना फिजूल है कद आसमान का”; फडणवीस बजेट मांडताना काय म्हणाले?
“कृषिक्षेत्रात भांडवली गुंतवणूक करून पायाभूत सुविधा तयार केली जाणार आहे. संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. सूक्ष्म, लघु, उद्योगांना आर्थिक मदत केली जाणार आहे. बुलेट ट्रेनमधील ठाणे ते तलासरीमधील तीन स्थानकांचे काम 2027 पर्यन्त पूर्ण होणार आहे. मुंबई, दुबई, सिंगापूरमध्ये पर्यटन गुंतवणूक कक्ष सुरू केला जाणार आहे. गडचिरोली स्टील हब म्हणून उदयास येत आहे. राज्याचा कृषी जीडीपी वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार केला जाणार,” असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.






