धाराशिवशी नाळ असलेल्या भूमिपुत्राचा जागतिक सन्मान; डॉ. अनिलकुमार गायकवाड यांची IRF इंडिया चॅप्टरच्या अध्यक्षपदी एकमताने निवड
आधुनिक रस्ते विकास, सुरक्षित वाहतूक व्यवस्था आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणीत उल्लेखनीय कार्य करणारे अभियंता म्हणून डॉ. गायकवाड यांची देशभरात ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली साकार झालेला मुंबई ते पुणे मिसिंग लिंक प्रकल्प हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जात असून त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
MSRTC च्या NCMC कार्ड ला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पुण्यात महिनाभरात १ लाखांहून अधिक अर्ज
तसेच बांद्रा ते वरळी सी लिंक, दिल्ली येथील महाराष्ट्र सदन, मुंबई मंत्रालयाचे नूतनीकरण, मुंबई उच्च न्यायालयाचे नूतनीकरण आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग यांसारखे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्णत्वास गेले आहेत.
रस्ते विकास, पूल, बोगदे आणि आधुनिक अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत IRF इंडिया चॅप्टरने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल धाराशिव जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक व अभियांत्रिकी क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
इंजि. डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भारतातील पायाभूत सुविधा विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
विशेष म्हणजे त्यांचे वडील शिक्षक असताना धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील कुंभेफळ येथे कार्यरत असताना डॉ. अनिलकुमार गायकवाड यांनी आपले बालपण तिथे व्यतीत केले आहे. परिणामी त्यांची धाराशिव जिल्ह्याशी खास असे ऋणानुबंध बंध आहेत. आतंरराष्ट्रीय कीर्तीच्या स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील राष्ट्रीय अध्यक्षपद त्यांना मिळाल्याचे वृत्त जिल्ह्यात प्रसारित होताच धाराशिव जिल्ह्यासह देशभरात मराठी माणसाची मान अभिमानाने उंचावली आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून कौतुकाचा वर्षाव होत आहे.






