पंतप्रधान मोदींवरील टीकेवर एकनाथ शिंदेंचा हर्षवर्धन सपकाळानां सडेतोड उत्तर (Photo Credit- X)
हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाचा तीव्र निषेध करत एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांची कानउघाडणी केली. शिंदे म्हणाले,”हर्षवर्धन सपकाळ हे जेमतेम एक-दीड वर्ष झाले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. ज्यांच्यावर त्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आरोप केला, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे आणि विकासाचे धुरंधर नेते आहेत. ज्यांनी हा आरोप केला, त्यांची ….? हा प्रकार म्हणजे थेट सूर्यावर थुंकण्यासारखा आहे. कुठे राजा भोज आणि कुठे गंगू तेली! त्यामुळे या विधानाचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. देशातील १४० कोटी जनता काँग्रेसला या कृत्याबद्दल योग्य धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.”
LIVE पत्रकारांशी संवाद 📍 मुंबई https://t.co/OCJidylpXI — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 26, 2026
Eknath Shinde Amit Shah meeting: अमित शाह-एकनाथ शिंदेंची गुप्त भेटीमागचे नेमके कारण काय?
आपल्या भाषणादरम्यान, सपकाळ यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावरही जोरदार टीका केली. त्यांनी असा दावा केला की, जेव्हा बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी भारताकडे कांद्याची मागणी केली होती, तेव्हा केंद्र सरकारने अचानक कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली. परिणामी, बांगलादेश, श्रीलंका आणि इराण यांसारख्या देशांनी भारताकडून कांदा खरेदी करणे थांबवले आणि त्याऐवजी इतर देशांकडे आपला मोर्चा वळवला. पंतप्रधान मोदी यांचे वर्णन “भांडकुदळ” असे करत त्यांनी ठामपणे सांगितले की, जोपर्यंत हे सरकार केंद्रात सत्तेवर आहे, तोपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणताही देश भारतीय शेतकऱ्यांकडून कांदा आयात करण्यास तयार होणार नाही.
आपल्या भाषणात हर्षवर्धन सपकाळ यांनी नमूद केले की, २०१४ मध्ये मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात कांद्याचे दर ३,००० रुपये प्रति क्विंटल होते; मात्र, सध्याच्या प्रशासनाच्या सदोष धोरणांमुळे हे दर आता पूर्णपणे कोसळले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही “गद्दार” आणि “फसवणूक करणारे” असे संबोधले. कांद्याला प्रति क्विंटल २,४०० रुपये देण्याचे आश्वासन सरकारने सुरुवातीला दिले होते, मात्र आता त्या आश्वासनावरून सरकारने माघार घेतली असून केवळ १,२०० रुपये देऊ करत असल्याचा आरोप त्यांनी केला.






