मंत्री मंगल प्रभात लोढा (फोटो- ट्विटर)
कौशल्य विकास केंद्रांची एक हजार पर्यंत वाढवली जाणार
महात्मा ज्योतिराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा
झोपडपट्टी परिसरातही ही प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार
मुंबई: कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यात युवक-युवतींसाठी महात्मा ज्योतिराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र प्रथम टप्प्यात शंभर केंद्र सुरू करण्यात येणार आहेत आगामी काळात राज्यात या कौशल्य विकास केंद्रांची एक हजार पर्यंत ही संख्या वाढविणार आहोत.ही योजना मुंबई महापालिका क्षेत्रात ही मुंबई शहर व उपनगर मध्ये राबविण्यात येणार आहे.महानगरपालिकेमार्फत या कौशल्य केंद्रांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती आयुक्तांना पत्राद्वारे करण्यात आली आहे अशी माहिती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
मुंबई महानगरपालिकेत आयोजित पत्रकारांशी संवाद साधताना कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते. महापालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांचीही भेट त्यांनी घेतली. या भेटीदरम्यान मुंबईच्या विविध समस्यांसह तरुणांच्या रोजगारासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, महात्मा ज्योतिराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करणे या योजनेत नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणासोबत कौशल्याची सांगड घालण्यात येणार आहे.
झोपडपट्टी परिसरातही ही प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. शहरी भागात आवश्यक असलेले कौशल्य शिकविण्यात येतील. पदवी सोबत कौशल्य अवगत असेल तरच रोजगाराच्या संधी अधिक उपलब्ध होतील.
आज मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे जी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. या भेटीत मुंबई उपनगर जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. प्रामुख्याने तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी महानगरपालिकेच्या सहकार्याने उपनगरातील दुर्गम व झोपडपट्टी… pic.twitter.com/coi0hVqjJp — Mangal Prabhat Lodha (@MPLodha) April 16, 2026
हँगिंग गार्डन (फिरोजशहा मेहता गार्डन) येथे ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधेसाठी रॅम्प तयार करणे, सायन येथील ‘अम्मान देखनी’ संस्थेजवळील डीपी रोडवर झालेले अतिक्रमण हटवून तो रस्ता रहिवाशांसाठी मोकळा करावा, याबाबत मुंबई महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्यात आली.मुंबईतील पायाभूत सुविधा आणि तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महानगरपालिका आणि राज्य सरकार मिळून काम करतील, असा विश्वास यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला.
‘इंडिया स्किल स्पर्धेतील विजेत्यांना…’; Mangal Prabhat Lodha यांची घोषणा
Mangal Prabhat Lodha यांची घोषणा
इंडिया स्किल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्यांना १ लाख रुपये, रौप्यपदक विजेत्यांना ७५ हजार आणि कांस्यपदक विजेत्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे विशेष पुरस्कार कौशल्य विकास विभागामार्फत देण्याची घोषणा कौशल्य,रोजगार,उद्योजकता व विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली. एल्फिस्टन तांत्रिक विद्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात कौशल्य मंत्री लोढा यांच्याहस्ते कौशल्य विभागाचा पारितोषिक वितरण सोहळा झाला. यावेळी कौशल्यमंत्री लोढा यांनी राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेतील पदक विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्याचबरोबर राज्यातील उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि ‘कौशल्याचार्य’ या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिल्पनिदेशकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.






