• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Chandrakant Choundkar Has Demanded A Loan Waiver For Farmers From The Chief Minister

शेतकरी आर्थिक संकटात, कर्जमाफीचा निर्णय तात्काळ घ्या; चंद्रकांत चौंडकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सर्वसमावेशक कर्जमाफीचा निर्णय तातडीने जाहीर करावा, अशी मागणी चंद्रकांत विष्णू चौंडकर यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 03, 2026 | 01:53 PM
शेतकरी आर्थिक संकटात, कर्जमाफीचा निर्णय तात्काळ घ्या; चंद्रकांत चौंडकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नीरा : राज्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या गंभीर संकटात सापडले असताना सर्वसमावेशक कर्जमाफीचा निर्णय तातडीने जाहीर करावा, अशी मागणी पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील नायगाव विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत विष्णू चौंडकर यांनी राज्य शासनाकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे सविस्तर पत्र पाठवून शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणींकडे लक्ष वेधले आहे.

 

त्यांनी पत्रात नमूद केले आहे की, अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती आणि शेतीमालाला सातत्याने मिळत नसलेल्या हमीभावामुळे राज्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे पिचला आहे. अनेक वर्षांपासून कर्जमाफीच्या आशेवर असलेला शेतकरी आजही शासनाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे. स्पष्ट धोरण जाहीर न झाल्याने ग्रामीण भागात संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.

दरवर्षीप्रमाणे मार्च अखेरीस पीक कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकांकडून वसुलीचा तगादा सुरू झाला आहे. मात्र, कर्जमाफीबाबत शासनाकडून ठोस निर्णय नसल्याने शेतकरी मोठ्या मानसिक तणावाखाली आहे. कोणते कर्ज माफ होणार आणि कोणते नाही, कर्जमाफीचे निकष काय असणार याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

चौंडकर यांनी आपल्या पत्रात विशेषतः नमूद केले आहे की, नियमित कर्जफेड करणारे आणि थकबाकीदार अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच शासनाने सकारात्मक निर्णय जाहीर केल्यास ३१ मार्च २०२६ पर्यंत भराव्या लागणाऱ्या पीक कर्जाच्या दडपणातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य टिकून राहण्यास मदत होईल.

ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम

सध्या कर्जवसुलीच्या पार्श्वभूमीवर अनेक शेतकरी कर्ज भरण्याच्या मानसिकतेत नसल्याचेही त्यांनी अधोरेखित केले आहे. परिणामी विविध कार्यकारी सोसायट्यांवरही आर्थिक ताण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शून्य टक्के व्याज योजनेचा लाभ घेण्यातही शेतकऱ्यांना अडचणी येत आहे. शासनाच्या निर्णयातील विलंबामुळे संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांमधील संभ्रम दूर करावा

शासनाने केवळ आश्वासने न देता कर्जमाफीबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी, निकष पारदर्शकपणे मांडावेत आणि शेतकऱ्यांमधील संभ्रम दूर करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेतल्यासच ग्रामीण भागातील आर्थिक अस्थिरता कमी होईल, असेही त्यांनी पत्राद्वारे नमूद केले आहे. राज्यातील शेतकरी अनेक वर्षांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असून आता शासनाने विलंब न करता ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

Web Title: Chandrakant choundkar has demanded a loan waiver for farmers from the chief minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Dattatraya Bharane
  • Farmers

संबंधित बातम्या

पुरंदरला मल्टीस्पेशालिटी शासकीय हॉस्पिटलची उभारणी करावी; आमदार विजय शिवतारे यांची मागणी
1

पुरंदरला मल्टीस्पेशालिटी शासकीय हॉस्पिटलची उभारणी करावी; आमदार विजय शिवतारे यांची मागणी

मनोज जरांगे पाटलांचा धनंजय मुंडेंच्या समर्थकाला इशारा, म्हणाले; फक्त तू…
2

मनोज जरांगे पाटलांचा धनंजय मुंडेंच्या समर्थकाला इशारा, म्हणाले; फक्त तू…

…तर सह्याद्री राज्यात विक्रम प्रस्थापित करेल; माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचा विश्वास
3

…तर सह्याद्री राज्यात विक्रम प्रस्थापित करेल; माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचा विश्वास

Ajit pawar : बारामती विमानतळाला अजित पवार यांचे नाव द्या; कुणी केली मागणी ?
4

Ajit pawar : बारामती विमानतळाला अजित पवार यांचे नाव द्या; कुणी केली मागणी ?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Iran Strategy : काय आहे इराणची मोजॅक रणनीती? ४ दिवसांतच अमेरिका-इस्रायलला फुटला घाम; ट्रम्प यांच्यासाठी इराण ठरतोय गळ्याचा फास?

Iran Strategy : काय आहे इराणची मोजॅक रणनीती? ४ दिवसांतच अमेरिका-इस्रायलला फुटला घाम; ट्रम्प यांच्यासाठी इराण ठरतोय गळ्याचा फास?

Mar 03, 2026 | 03:20 PM
1 लाख रुपयांपेक्षा जास्त पगार मिळणार, सरकारी नोकरीची मोठी संधी! जाणून घ्या कुठे आणि कसा कराल अर्ज

1 लाख रुपयांपेक्षा जास्त पगार मिळणार, सरकारी नोकरीची मोठी संधी! जाणून घ्या कुठे आणि कसा कराल अर्ज

Mar 03, 2026 | 03:16 PM
KP Unnikrishnan passed away : केरळच्या राजकारणातील परखड आवाज हरपला; माजी केंद्रीय मंत्री केपी उन्नीकृष्णन यांचे निधन

KP Unnikrishnan passed away : केरळच्या राजकारणातील परखड आवाज हरपला; माजी केंद्रीय मंत्री केपी उन्नीकृष्णन यांचे निधन

Mar 03, 2026 | 03:11 PM
विद्यार्थ्यांना ‘हे’ कॉलेज देणार तब्बल 75 लाखांची स्कॉलरशिप; काय असणार नियम व अटी?

विद्यार्थ्यांना ‘हे’ कॉलेज देणार तब्बल 75 लाखांची स्कॉलरशिप; काय असणार नियम व अटी?

Mar 03, 2026 | 03:11 PM
Chandra Grahan 2026: एकाच महिन्यात 2 ग्रहण, भारतासह जगभरावर होणार अनिष्ट परिणाम; ज्योतिषाचार्यांची भविष्यवाणी

Chandra Grahan 2026: एकाच महिन्यात 2 ग्रहण, भारतासह जगभरावर होणार अनिष्ट परिणाम; ज्योतिषाचार्यांची भविष्यवाणी

Mar 03, 2026 | 03:08 PM
US-Israel Iran War: “माझ्या मुलाला भारतात घेऊन या साहेब”; लेकासाठी अभिनेत्री विशाखा सुभेदारची शासनाला विनंती

US-Israel Iran War: “माझ्या मुलाला भारतात घेऊन या साहेब”; लेकासाठी अभिनेत्री विशाखा सुभेदारची शासनाला विनंती

Mar 03, 2026 | 03:05 PM
Iran Israel युद्धाचा मराठवाड्याला तडाखा! १११ नागरिक आखाती देशांत अडकले; छत्रपती संभाजीनगरमधील १० जणांच्या सुटकेसाठी हालचाली

Iran Israel युद्धाचा मराठवाड्याला तडाखा! १११ नागरिक आखाती देशांत अडकले; छत्रपती संभाजीनगरमधील १० जणांच्या सुटकेसाठी हालचाली

Mar 03, 2026 | 03:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM
Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Mar 02, 2026 | 10:58 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Mar 02, 2026 | 10:55 PM
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.