सौजन्य - नवराष्ट्र टीम
धैर्यशील वंडेकर म्हणाले, २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळ परिसरात झालेल्या दुर्दैवी विमान दुर्घटनेत त्यांचे अकाली निधन झाले. दिवंगत अजितदादा पवार यांनी सिंचन, जलसंपदा, वित्त, सहकार, ऊर्जा व नियोजन यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळत राज्याच्या सामाजिक व आर्थिक विकासात मोलाचे योगदान दिले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीला ‘बारामती मॉडेल’ या एकात्मिक ग्रामीण विकासाच्या आदर्श उदाहरणात रूपांतरित करण्यात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली.
तसेच सिंचन प्रकल्प, सहकार चळवळ बळकटीकरण, पायाभूत सुविधा, शिक्षण, उद्योग, कृषी व पर्यटनक्षेत्रात त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला. बारामती विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठीही त्यांचे विशेष नियोजन होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विकासकामांना गती देण्याचे निर्देश दिले होते. राज्य व केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यास दिवंगत अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील कार्याचा सन्मान ठरेल, असं वंडेकर म्हणाले.
हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प सादर; पैसा कुठे खर्च होणार? वाचा सविस्तर






