युद्धाचा मराठवाड्याला तडाखा! १११ नागरिक आखाती देशांत अडकले (Photo Credit- X)
मध्यपुर्वेतील इराण आणि इस्त्रायल या देशात भयंकर युद्ध सुरू आहे. या युद्धाने आखाती देशातील युएई, कतार, बहरीन यासह इतर देशांच्या हवाई सेवा बंद करण्यात आल्या आहेत. हवाई क्षेत्र बंद झाल्याने भारतातून या देशांमध्ये गेलेले प्रवासी अडकून पडले आहेत. विशेषतः दुबईत अडकलेल्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. अडकलेल्या नागरिकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.0000
Iran Israel War: अमेरिकेवर अणुबॉम्ब पडणार? इराणमध्ये आलेला भूकंप नैसर्गिक की…? विनाश निश्चित
सोमवारी सकाळपर्यंत मराठवाड्यातील ३४ प्रवाशी अडकल्याचे सांगण्यात येत होत तेच सायंकाळी सहाच्या सुमारास यात वाढ होऊन एकूण १११ प्रवाशी अडकल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातून देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील १० प्रवाशांना परत आणण्याच्या हालचाली सुरु असल्याचे मस्के यांनी सांगितले आहे. यात मराठवाड्यातील प्रवाशांनाही आणले जाणार आहे. सोमवार सायंकाळी ६ वाजेपर्यंत संभाजीनगर शहरातील १० जण आखाती देशांमध्ये अडकल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापक कक्षाने दिली आहे.
शहरातील दोन प्रमुख कुटुंबांसह १० जण सध्या दुबई आणि इजिप्तमध्ये अडकले आहेत:
या दाह जणांना परत आणण्यासाठी दूतावास स्तरातून प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
Iran Israel War : टेक्सासमध्ये रक्ताचा सडा! इराण समर्थकाच्या गोळीबारात भारतीय विद्यार्थिनीसह चार ठार






