पुणे-नाशिक प्रवास होणार वेगवान (फोटो- istockphoto)
मुंबई-पुणे हायवेवरुण नाशिक लवकर जाता येणार
वाहतूक कोंडी मुक्त रस्ता पाहायला मिळणार
मुंबई-नाशिक प्रवास सुखकर होणार
पुणे: तळेगाव -चाकण –शिक्रापूरमधील वाहतूक कोंडी आता कमी होणार आहे. कारण मुंबई-पुणे हायवेवरुन नाशिक गाठता येणाऱ्या नवीन मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. जुन्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरुन प्रवास करताना चाकण तळेगाव एमआयडीसी परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी असते.आता थेट जुन्या मुंबई –पुणे महामार्गावरुन पुणे –नाशिक महामार्गावर जाता येणार आहे.त्यामुळे मुंबई ते नाशिक हा प्रवास वाहतूक कोंडी मुक्त होणार आहे.
चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेञाचा विस्तार झाला असून यामुळे या परिसरातून दररोज हजारो वाहने जातात.या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने वाढत आहे. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एमआयाडीसीने पर्याय रस्त्याचे नियोजन केले आहे.या नियोजनानुसार रस्त्याचे काम वेगाने सुरु आहे. हे काम लवकाच पूर्ण केले जाणार आहे.नवीन रस्ता मुंबई पुणे जुन्या महामार्गावरुन सुरु होणार आहे.तो पुढे देहू रोडकडून तळेगाव एमआयडीसीत प्रवेश करता येईल.तळेगाव औद्योगिक क्षेञातील नवलाख उंबरे गावाबाहेरुन नवीन रस्ता करण्यात आला आहे. आता नवीन रस्त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
बेशिस्त वाहनचालक पोलिसांच्या रडारवर
नाशिकमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहतूक कोंडीला हातभार लावणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना वाहतूक पोलिसांनी रडारवर घेण्यास सुरूवात केली आहे. रस्त्यावर बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर प्रत्येक पोलिस ठाण्याने कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत. जानेवारी महिन्या रहदारीस अडथळा आणल्याप्रकरणी दोन हजार २८५ केसेस करण्यात आल्यात. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरातील पायाभूत सुविधांच्या कामांनी गती पकडण्यास सुरूवात केली आहे. यामुळे प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक शहरातंर्गत रस्त्यावर वळवण्यात आली आहे.
Nashik News: बेशिस्त वाहनचालक पोलिसांच्या रडारवर, महिनाभरात ११ हजार वाहनचालकांना ७७ लाखांचा दंड
वाहने पार्क करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. वाहतूक पोलिस वाहतूक नियमन करताना बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करतात. पण, पार्किंगबाबत स्थानिक पोलिस ठाण्यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश कर्णिक यांनी दिले आहेत. मागील काही दिवसांपासून कलम २८५ नुसार शेकडो गुन्हे दाखल झालेत. मात्र, त्याची व्याप्ती ठराविक पोलिस ठाण्यांपुरती मर्यादीत आहे. त्यामुळे शहरातील पोलिस ठाण्याच्या प्रमुखांनी प्रत्येकी किमान पाच गुन्हे दाखल करावेत, असे कर्णिक यांनी स्पष्ट केले आहे. शहरातंर्गत बेशिस्त वाहतुकीला लगाम बसल्यास कोंडी होणार नाही.






