फोटो सौजन्य: गुगल
बाजार भाव काही वेळा कमी असल्यामुळे खर्चही निघत नाही. पण सध्या ऊन्हाचा फटका शेती पिकांना बसत असून मोठ्या प्रमाणावर उन पडत असल्याने शेती पिके होरपळ आहेत. ज्या पिकांना आठ ते नऊ दिवसांनी पाणी मिळते ती पिके वाळून चालली आहेत. चार ते पाच दिवसाला पाणी देणारी पिके बऱ्यापैकी हिरवी आहेत. एकंदरीतच पिकांना चौथ्या दिवशी प्रचंड उष्णतेमुळे पाणी द्यावे लागत आहे. त्यातही जमिनीची प्रतवारी पाहन हे पाण्याचे प्रमाण कमी जास्त होते. मुरमाड शेतातील पिकांना दोन-तीन दिवसाला पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे एकंदरीत शेतातील पिके व पाणी याचा ताळमेळ घालावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपले काही क्षेत्र पडीक ठेवले असून पाण्याच्या नियोजनानुसार शेती पिकांचे प्रमाण कमी केले आहे.
35 अंश असणारे तापमान आता 38 ते 40 अंशावर गेले आहे. त्यामुळे ऊन्हाचा फटका शेती पिकांना मोठ्या प्रमाणात बसत असून सध्या शेती पिकांची मोठ्या प्रमाणावर होरपळ होत असल्याचे पहावयास मिळत आहे.
– श्वेताताई ढोबळे, सदस्या पंचायत समिती आंबेगाव तालुका.
66 सध्या मोठ्या प्रमाणावर पडणारे उन हा मोठा प्रश्न बनला असून पर्यावरणाचा झालेला हास याला कारणीभूत आहे. सध्या शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात झालेली वृक्ष तोड, सिमेटचा अतिवापर, मोठ्या इमारती, ग्रामीण भागातही वृक्षतोड, रस्ते, घरे व अनेक विकास कामांसाठी होत आहे. यामुळे पर्यावरणाची हानी होऊन वातावरणात मोठे बदल झाले आहेत. त्यासाठी झाडे लावणे आणि जगविणे महत्वाचे आहे.
– संदीप टेमकर, उद्योजक निरगुडसर,






