कर्जतमधील राजनाला कालव्याचे मोठे नुकसान; 2 हजार हेक्टर शेतीच्या पाणीपुरवठ्यावर संकट, शेतकऱ्यांकडून तातडीच्या दुरुस्तीची मागणी
माथेरान मिनी ट्रेनला हायड्रोजन इंजिनची जोड; ब्रिटिश काळातील वाफेच्या इंजिनाचाच नवा फंडा
राजनाला कालव्याच्या उजवा कालवा म्हणजे कराळेवाडी-मांडवणे-हेदवली-सावळे गावापर्यंत जाणारा कालवा असून या कालव्यामुळे शेकडो एकर जमीन ओलीताखाली येत असते. या कालव्यामुळे दुबार शेतीसाठी शेतकऱ्यांना चालना मिळत असते. २०२३ ते २०२४ रोजी या कालव्याला पाणी सोडले असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये भाताचे पीक पाहायला मिळाले. मुसळधार पावसामुळे कालव्याचे अनेक भागात नुकसान झाले आहे.
कालव्याच्या काही नाल्याचा कॉंक्रिटीकरण पूर्णपणे पाण्यामध्ये वाहून गेला आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या शेतीकडे जाणारा मार्गही या नाल्याच्या निकृष्ट कामामुळे पूर्णपणे वाहून गेला आहे. शेतकऱ्यांचा ये जा करणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. २०२६ मध्ये या नाल्याच्या कामाला सुरुवात झाली. परंतु हे काम चालू असताना पाटबंधारे अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केल्याचr तक्रार देखील स्थानिक शेतकऱ्यांकडून केली जात आहे. दरम्यान हेदवली येथील शेतकरी हरिचंद्र म्हसकर, राम गायकर, संतोष जोशी, झिपा जोशी, मंगल जोशी असे अनेक शेतकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
उजवा कालव्याचे बांधकाम केले जात असताना आम्ही शेतकरी म्हणून आमच्या नाल्याचे निष्कृष्ट दर्जाचे काम चालू आहे. अधिकाऱ्यांना लक्ष दिले असते तर कालव्याला धोका पोहचला नसता. – हरिचंद्र म्हसकर, शेतकरी
यावर्षी काम पूर्ण करून पुढच्या वर्षी २०२६ ते २०२७ मध्ये शेतीसाठी पाणी सोडणार होते. डिसेंबर महिन्यापर्यंत जी नाल्याची दुरावस्था झाली आहे ते पूर्ण करून आम्हाला पाणी सोडण्यात यावे. – राम गायकर, शेतकरी






