(फोटो सौजन्य: Pinterest)
मत्स्यदुष्काळ आणि जागतिक घडामोडींचा परिणाम
सध्या समुद्रात माशांचे प्रमाण कमी असल्यामुळे कोकणातील मच्छिमारांना युद्धाचा थेट फटका बसलेला नाही. मात्र भविष्यात जर समुद्रातील मत्स्यसंपदा पुन्हा वाढली. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिला, तर मासेमारी करून मिळणाऱ्या उत्पादनांच्या निर्यातीवर मोठा परिणाम होऊ शकतो. विशेषतः निर्यातक्षम कोळंबी व इतर उच्च मूल्यांच्या माशांच्या विक्रीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर काही कोळी बांधवांनी आतापासूनच पर्यायी मार्गाचा विचार सुरू केला आहे. स्थानिक बाजारपेठांवर भर देणे, प्रक्रिया उद्योगाकडे वळणे, मत्स्य व्यवसायाबरोबर पूरक व्यवसाय उभारण्याच्या व्यवसायाला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. मत्स्यदुष्काळ आणि जागतिक घडामोडींचा दुहेरी फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
समुद्री वाहतुकीवर परिणाम, निर्यातदारांत चिंता
परिणामी अरबी समुद्रातील मत्स्यसपदा कमी होत असल्याची मीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणावामुळे समुद्री वाहतुकीवरही परिणाम होत आहे. भारतातून निर्यात होणारी साखर, केळी, द्राक्षे, मिरच्या, कांदे आणि इतर कृषी उत्पादने सध्या मोठ्या प्रमाणावर कंटेनरमध्ये भरून जेएनपीटी बंदरात पडून असल्याची माहिती व्यापार क्षेत्रातून मिळत आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर काही समुद्री मार्गावरील हालचालीवर निर्बंध येत असल्याने निर्यात प्रक्रियेत विलंब होत आहे. याचा थेट परिणाम कृषी उत्पादनाव्या व्यापारावर होत असून निर्यातदारांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






