संजय निरुपम यांचा ओवैसी आणि काँग्रेसवर घणाघाती वार (Photo Credit- X)
मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय निरुपम म्हणाले की, “वंदे मातरम हे गीत आपल्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक असून ते आता १५० व्या वर्षात पदार्पण करत आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात लाखो क्रांतिकारक आणि सामान्य नागरिकांनी या गीताचा जयघोष करत बलिदान दिले आहे. हे गीत आपल्यासाठी प्रेरणेचा स्रोत आहे. अशा पवित्र गीतावर जर कोणी आक्षेप घेत असेल, तर ती व्यक्ती अंतर्मनातून भारतीय असूच शकत नाही. विरोध करणाऱ्यांनी खुशाल हा देश सोडून जावे.”
Mumbai, Maharashtra: On AIMIM chief Asaduddin Owaisi’s remarks on Vande Mataram, Shiv Sena spokesperson Sanjay Nirupam says, “…Vande Mataram song is marking its 150th anniversary. It was sung by lakhs of freedom fighters and people who drew inspiration from it during India’s… pic.twitter.com/XFA2wU8t9k — IANS (@ians_india) May 8, 2026
हिंदी भाषेच्या वापरावरून सुरू असलेल्या वादावर भाष्य करताना निरुपम यांनी स्पष्ट केले की, कोणावरही हिंदी लादली जात नाही. “हिंदी जरी तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रभाषा नसली, तरी ती राजभाषा आणि संवादाची प्रमुख भाषा म्हणून सर्वमान्य आहे. जर सरकारी अधिकाऱ्यांसाठी हिंदी शिकण्याचा प्रस्ताव आला असेल, तर त्याचे स्वागत व्हायला हवे. एखादी नवी भाषा शिकणे हे कधीही फायद्याचेच असते, त्यावर विनाकारण वाद घालणे चुकीचे आहे,” असे त्यांनी नमूद केले.
तमिळनाडूमध्ये सुपरस्टार विजय यांच्या ‘टीव्हीके’ (TVK) पक्षाला पाठिंबा देण्याच्या काँग्रेसच्या निर्णयावर निरुपम यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, “काँग्रेसने कधीही आघाडीचा धर्म पाळलेला नाही, हा त्यांचा इतिहास आहे. तमिळनाडू निवडणुकीत काँग्रेसने डीएमके (DMK) सोबत युती केली, पण तिथे त्यांचा दारूण पराभव झाला. आता अभिनेता विजय एक नवे राजकीय नेतृत्व म्हणून समोर आले आहेत आणि त्यांचा पक्ष डीएमकेच्या विरोधात आहे. असे असतानाही केवळ सत्तेच्या मोहापायी काँग्रेसने आपल्या ५ आमदारांसह त्यांना पाठिंबा जाहीर केला. ही कृती म्हणजे आघाडी धर्माचा अपमान आणि काँग्रेसचा संधीसाधूपणा आहे.”
सोमनाथ मंदिराचा उल्लेख करताना संजय निरुपम यांनी इतिहासातील जखमांना उजाळा दिला. “आज आपण सोमनाथ मंदिरावर झालेल्या आक्रमणाला एक हजार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा काळ आठवत आहोत. महमूद गझनवीने हे प्राचीन मंदिर उद्ध्वस्त करून लुटले होते. मात्र, आजच्या काळात सोमनाथ मंदिराचा झालेला जीर्णोद्धार आणि विकास हा भारताच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाचा आणि आत्मसन्मानाचा मोठा पुरावा आहे,” असेही ते म्हणाले.
Shivsena News : परभणीत उबाठाचा मुस्लिमधार्जिणा चेहरा समोर आला, संजय निरुपम यांची खरमरीत टीका






