जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृह जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली .यावेळी उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, सभापती अमृता वाघे ,संस्कृती सातपुते ,चेतन सिंह केदार, रामाप्पा चिवडशेट्टी ,मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागात असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर व कर्मचारी उपस्थित नसतात .त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सुविधा मिळत नाहीत .त्यामुळे त्या ठिकाणी तातडीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून प्रत्येक तालुक्याला एक ॲम्बुलन्स देण्यात यावी अशी मागणी यावेळी सदस्य चरणदास चौरे, अतुल पवार आदींनी केली.
“गडकरी मुख्यमंत्री असते तर…” प्रणिती शिंदे यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा
प्राथमिक शाळेत शिक्षक उपस्थित राहत नाहीत. शिक्षकांची संख्या अपुरी आहे .शाळेत सुविधा नाहीत. संगणकही अनेक शाळेत नाहीत .त्यामुळे शाळेत शिक्षकांची नियुक्ती करून शिक्षकांना बायोमेट्रिक प्रणाली हजेरी सक्तीची करण्यात यावे अशी मागणी यावेळी बहुतांश सदस्यांनी केली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित राहत नसल्याचे तक्रारी यावेळी सदस्यांनी केली.
चार वर्षातील विकासाचे बॅकलॉग भरून काढण्याचे आव्हान या शीर्षकाखाली दैनिक नवराष्ट्र ने प्रकाशित केलेल्या बातमीचा आधार घेत जिल्हा परिषद सदस्यांनी या सभेत रखडलेल्या विकास कामांची यादी सादर करून या कामांना गती देण्याची मागणी केली. जिल्हा परिषदचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याचे मागणी केली. सोलापुरातील नेहरू हॉस्टेल येथील व सोलापूर शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळांची मूल्यांकन करून मालमत्तेचा तपशील व विकासाचा तपशील सविस्तर सादर करण्यासाठी कमिटी नेमण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. जिल्हा परिषदचे सदस्य डॉक्टर पृथ्वीराज माने यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली.
Solapur ZP अधिकाऱ्यांचा पंतप्रधान Narendra Modi यांच्या आवाहनाला प्रतिसाद; घेतला ‘हा’ निर्णय






