जनाई-शिरसाई योजनेसाठी रोहित पवार 'ॲक्शन मोड'वर! (Photo Credit- X)
पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर आणि दौंड तालुक्यांतील दुष्काळी भागासाठी जनाई-शिरसाई ही एक अत्यंत महत्त्वाची उपसा सिंचन योजना आहे. या योजनेला खडकवासला प्रकल्पातून पाणी मिळत असून अवर्षणप्रवण (दुष्काळी) भागाला सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे. सिंचन भवनला जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांची बैठक घेऊन या योजनेतील अडचणी मांडल्या आणि त्यावर सविस्तर चर्चाही केली. या बैठकीला जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता अलका अहिरराव, अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके, कार्यकारी अभियंता शेटे, देशमुख आणि इतर अधिकारी यांच्यासह बारामती आणि पुरंदर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बारामती तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेतील विविध अडचणींसंदर्भात पुण्यात जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता (ID) अलका अहिरराव मॅडम, अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके साहेब, कार्यकारी अभियंता शेटे साहेब, देशमुख साहेब आणि इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन ही… pic.twitter.com/ef4reYKtON — Rohit Pawar (@RRPSpeaks) May 15, 2026
खडकवासला कालव्याची वहन क्षमता अपुरी असल्याने १००० क्युसेक्सने पाणी सोडले तरी इंदापूरला केवळ १२५ क्युसेक्स पाणी उपलब्ध होते. सिंचनासाठी इंदापूर-बारामतीला २०-२५ दिवस, भिगवन शाखेला १७-१८ दिवस आणि दौंडमधील उर्वरित फाट्यांना १५ दिवस लागून एकूण कालावधी ५०-५४ दिवस होतो. त्यामुळे जनाई-शिरसाई योजनांसाठी आवश्यक २०० क्युसेक्स पाणी उपलब्ध होत नाही. खडकवासला कालव्याची वहन क्षमता वाढवून आणि पावसाळ्यात खडकवासला धरणातून सोडल्या जाणाऱ्या पुराच्या पाण्याचा वापर करून तलाव भरल्यास दुष्काळी भागाला मोठा फायदा होऊ शकतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंदिस्त पाणी योजना मंजूर केली असून त्यासाठी ४५० कोटी रुपये इतका भरीव निधीही मंजूर केला आहे. बंदिस्त पाइपलाइनला ठिबक सिंचनाची जोड मिळाली तर अधिक क्षेत्र ओलिताखाली येईल. सोलर प्रकल्प आणि तलावातील गाळ काढण्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली ;मात्र काम अद्याप प्रलंबित आहे. या सर्व मुद्द्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
Sunil Shelke News: रोहित पवारांनी ‘भविष्यवाणीचा’ धंदा सुरू केलाय का? सुनील शेळके यांचा जळजळीत सवाल
कालव्याची लांबी, वहन तूट आणि कमी क्षमता यामुळे जनाई-शिरसाईला फक्त १०-१२ दिवस पाणी मिळते. त्यामुळे हा कालावधीही वाढवण्याबाबत चर्चा झाली. याशिवाय जामनेर तालुक्यामध्ये राबविलेल्या योजनेप्रमाणे तेथील वाघुर धरणातून बंद पाईपलाईने उपसा सिंचन योजनेमधून आणलेल्या पाण्याकरिता १० एकर अथवा त्यापेक्षा अधिक क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्याला स्वतंत्र शेततळे आणि त्यापेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना सामुदायिक शेततळे शासनामार्फत देण्यात येते, याच धर्तीवर ही योजना आपल्याकडेही राबविली तर त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचा मुद्दा यावेळी त्यांनी मांडला. ज्या कॅनॉलमध्ये शेतकऱ्यांचे भूसंपादन झाले आहे त्याचे पैसे त्वरित मिळावेत. योजनेचे लाईटबील कायमस्वरूपी शासनाने भरावे, यासह इतर विविध मुद्द्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
‘‘जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेसाठी अजितदादांनी पहिल्यापासूनच मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला असल्याने योजनेतील अनेक कामं निविदा प्रक्रियेत आहेत. विशेषतः बंद पाईपलाईनचं कामही लवकर सुरु होणार आहे. खा. सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्यावतीने मांडण्यात आलेल्या प्रत्येक मुद्द्यावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. पुरंदर उपसा योजनेमध्येही अजितदादांनी ५५ कोटी रु. मंजूर केलेली इलेक्ट्रीक आणि इतर कामं पुढच्या तीन महिन्यात सुरु करण्याची मागणीही प्रशासनाने मान्य केली. या सकारात्मक सहकार्याबद्दल प्रशासनाचेही आभार. अपेक्षा आहे की, दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ही सर्व कामं वेगाने सुरु होतील.’’






