(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘बिग बॉस १९’ चा विजेता आणि लोकप्रिय टीव्ही अभिनेता गौरव खन्ना सध्या चर्चेत आहे. त्याचे कारण सलमान खानच्या रिॲलिटी शोमधून मिळालेली बक्षीस रक्कम अभिनेत्याला अद्यापह मिळाली असल्याचे वृत्त होते. परंतु, आता अलिकडेच गौरव खन्नाने खुलासा केला की त्याला बिग बॉस १९ मध्ये जिंकलेले पैसे आता मिळाले आहेत. या विधानामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आणि अनेक प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. दरम्यान, गौरव खन्नाने आता त्याच्या बक्षीस रकमेभोवती सुरू असलेल्या अटकळींना पूर्णविराम दिला आहे. अभिनेत्याने त्याला रोख बक्षीस मिळाल्याची पुष्टी केली आहे, ज्यामुळे पैसे देण्यास विलंब झाल्याबद्दलच्या अलिकडच्या ऑनलाइन चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
सलमान खान होस्ट असलेल्या बिग बॉस सीझन १९ मध्ये गौरव खन्नाने ५० लाख रुपयांची बक्षीस रक्कम जिंकली आहे. तीन महिन्यांनंतरही अभिनेत्याला बक्षीस रक्कम न मिळाल्यानंतर, गौरवने आपले मौन सोडले आणि खुलासा केला की त्याला अद्याप रोख रक्कम मिळालेली नाही. त्याचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यानंतर अभिनेत्याने त्याला ५० लाख रुपये मिळाल्याची पुष्टी आता गौरव खन्नाने केली आहे.
‘Indian Idol’ फेम गायिका सायली कांबळेने जाहीर केले बाळाचे नाव; जाणून घ्या काय आहे नावाचा अर्थ!
गौरव खन्नाने दिले स्पष्टीकरण
अभिनेता गौरव खन्ना पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यामागचे कारण म्हणजे त्यांनी झूमला दिलेली एक मुलाखत आहे. या मुलाखतीदरम्यान गौरव खन्नाने ‘बिग बॉस’च्या प्राइज मनीबाबत स्पष्टपणे भाष्य केलं आहे. गौरव खन्ना म्हणाला, “खरं तर ही गोष्ट खूपच वाढवून सांगितली जात आहे. ही क्लिप एका व्लॉगमधील आहे, जो सुमारे ४० दिवसांपूर्वी रेकॉर्ड करण्यात आला होता. त्या वेळी मी हिवाळ्यात माझ्या घरी जात होतो. हा व्लॉग नंतर रिलीज झाला, त्यामुळे लोकांना वाटलं की ही नवी रेकॉर्डिंग आहे; पण तसं नाही.”
तो पुढे म्हणाला, “दरम्यान मला माझं पूर्ण बक्षीस मिळालं आहे. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अशा गोष्टींना थोडा वेळ लागतो, ही बाब मी व्लॉगमध्येही कोणावरही दोष न देता स्पष्ट केली होती. त्यामुळे कृपया या गोष्टीला अनावश्यक वाढवू नका.”
‘बिग बॉस’च्या १९ व्या सीझनमध्ये गौरव खन्नाशी संबंधित अनेक वादही समोर आले होते. मात्र या सर्व अडचणींवर मात करत त्यांनी शेवटी ट्रॉफी आपल्या नावावर केली. गौरव खन्नाला लोकप्रिय टीव्ही मालिका अनुपमा मधील त्याच्या भूमिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली होती. सध्या मात्र ते आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.






