(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Deepika Padukone on Cannes : कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतीय प्रतिनिधित्व दरवर्षी अधिक मजबूत होत आहे, आणि 2026 मध्ये पुन्हा एकदा भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाची झलक पाहायला मिळाली. भारतीय सेलिब्रिटी, इन्फ्लुएंसर्स, चित्रपट निर्माते आणि क्रिएटर्स यांनी फिल्म प्रीमियर्स, जागतिक ब्रँड उपस्थिती आणि रेड कार्पेट क्षणांद्वारे फेस्टिव्हलमध्ये आपली छाप सोडली. या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर आता अनेकजण दीपिका पदुकोणच्या त्या जुन्या वक्तव्याची पुन्हा आठवण काढत आहेत. त्यामुळे सध्या दीपिका पादुकोण पुन्हा चर्चेत आली आहे. नेमकं कोणतं विधान आहे ज्यामुळे ती पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहेत? समजून घेऊयात.
2022 मध्ये, 75व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलदरम्यान इंडिया पॅव्हेलियनच्या उद्घाटनावेळी त्या वर्षीच्या प्रतिष्ठित कान्स ज्युरी सदस्य असलेल्या Deepika Padukone यांनी भारतीय सिनेमा आणि संस्कृतीच्या वाढत्या जागतिक प्रभावाबद्दल भावनिक भाष्य केले होते. त्या काळात भारतीय चित्रपट आणि प्रतिभेला सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळत होती, आणि अभिनेत्रीने व्यक्त केलेली दूरदृष्टी आज अनेकांना प्रत्यक्षात उतरू लागल्यासारखी वाटत आहे.
“भारत महानतेच्या उंबरठ्यावर आहे, ही फक्त सुरुवात आहे… मला खरोखर विश्वास आहे की एक दिवस असा येईल जेव्हा भारताला कान्समध्ये जाण्याची गरज भासणार नाही, तर कान्सच भारतात असेल,” असे दीपिका पदुकोण यांनी आपल्या भाषणात म्हटले होते.
कान्समध्ये भारतीयांची वाढती उपस्थिती पाहता हे वक्तव्य पुन्हा चर्चेत आले आहे. मग ते जागतिक लक्झरी ब्रँड्ससोबत भारतीय कलाकारांची भागीदारी असो, भारतीय चित्रपटांना मिळालेल्या स्टँडिंग ओव्हेशन्स असोत किंवा आंतरराष्ट्रीय चर्चांमध्ये भारतीय दिग्दर्शक आणि कलाकारांचा वाढता सहभाग असो.
दीपिका स्वतःही जागतिक स्तरावर भारतीय प्रतिनिधित्व पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. 2022 मध्ये कान्स ज्युरीचा भाग बनण्यापासून ते आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये सतत चर्चेत राहण्यापर्यंत, त्या जगभरात भारताचा एक प्रभावी आणि ओळख निर्माण करणारा चेहरा बनल्या आहेत.
मनोरंजन क्षेत्रात भारताचा प्रभाव जागतिक स्तरावर वाढत असताना दीपिका पदुकोण यांचे वक्तव्य आज अधिक सत्य वाटत आहे. अनेक ऑनलाइन यूजर्ससाठी, त्यांचे शब्द केवळ आशेचे प्रतीक नाहीत, तर भारतीय सिनेमा आणि त्याचा प्रभाव भविष्यात कोणत्या दिशेने जात आहे याचे संकेत देणारे ठरत आहेत, विशेषतः यंदाही कान्समध्ये मोठी भारतीय उपस्थिती पाहायला मिळाली आहे.






