(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
२०२६ मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेला ‘वध २’ आता लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढत चालली आहे. या चित्रपटात नीना गुप्ता आणि संजय मिश्रा हे अनुभवी आणि लोकप्रिय कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. कलाकारांच्या दमदार अभिनयावर आधारित ही फ्रँचायझी असल्याने सुरुवातीपासूनच चित्रपटाची चर्चा सुरू आहे.
चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एक भावनिक प्रसंग पाहायला मिळाला. संजय मिश्रा, नीना गुप्ता आणि कुमुद मिश्रा हे तिघे नुकतेच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD), नवी दिल्ली येथे गेले. ते सर्व NSDचे माजी विद्यार्थी आहेत. त्यामुळे तेथे त्यांना विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी आणि रंगभूमीप्रेमींनी मोठ्या प्रेमाने आणि आदराने स्वागत केले. या भेटीचा अनुभव खूप खास होता, कारण ही ठिकाणे सिनेमा आणि थिएटरच्या आठवणींनी भरलेली आहे. तिघे कलाकारांनी या दौऱ्यादरम्यान अभिनय, रंगभूमी आणि कला यांचा उत्सव साजरा केला.
या संवादादरम्यान संजय मिश्रा यांनी NSDमधील आपल्या सुरुवातीच्या दिवसांना उजाळा दिला आणि सीनियर्सकडून मिळालेल्या महत्त्वाच्या शिकवणीबद्दल सांगितले—विशेषतः इरफान खान यांच्याबद्दल. आपल्या अनुभवाबद्दल बोलताना मिश्रा म्हणाले, “मला स्वतःलाच माहित नाही की NSDमध्ये मी नेमकं काय शिकलो किंवा काय नाही, पण इरफान भाईंसारखे लोक आमच्यासोबत होते. तुम्ही फक्त त्यांना पाहत राहू शकत होतात. वीरेंद्र सक्सेना होते, अंकुरजी होते, रॉबिन दास आज इथेच समोर बसले आहेत आणि तुम्ही सगळे मोबाइलमध्ये गुंतलेले आहात.
त्यांना पाहणं हेच स्वतःमध्ये एक मोठं शिक्षण होतं. अनुप दा होते—असे कलाकार होते, ज्यांना तुम्ही सतत निरीक्षण करत राहायचात. मला आठवतं, एकदा इरफान भाई परफॉर्म करताना पाहून माझ्या मनात आलं, ‘हा माणूस अभिनय कधी सुरू करणार?’ त्या लेव्हलवर तो खेळत होता.”
त्यांच्या या शब्दांनी उपस्थित सगळ्यांनाच भावनिक केलं. NSDमध्ये शिकणं केवळ वर्गापुरतं मर्यादित नसून, मोठ्या कलाकारांना जवळून पाहून, त्यांचं निरीक्षण करूनच अभिनयाची खरी समज आणि कौशल्य विकसित होतं—हे या प्रसंगातून स्पष्ट झालं.
जसपाल सिंह संधू लिखित व दिग्दर्शित वध २ मध्ये संजय मिश्रा आणि नीना गुप्ता पूर्णपणे नव्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत, तर चित्रपटात पहिल्या भागातील इमोशनल आणि तात्त्विक खोली कायम ठेवण्यात आली आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्स बॅनरखाली तयार झालेला हा स्पिरिच्युअल सीक्वेल २०२६ मधील सर्वाधिक चर्चित चित्रपटांपैकी एक ठरतो आहे.
५६व्या IFFI 2025 मध्ये झालेल्या चित्रपटाच्या गाला प्रीमियरनंतर याचा बज आणखी वाढला. तिथे मिळालेल्या जोरदार टाळ्यांनी संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांची भारतीय सिनेमातील दिग्गज ओळख पुन्हा एकदा अधोरेखित केली.लव फिल्म्सची प्रस्तुती असलेला ‘वध २’ जसपाल सिंह संधू यांनी लिहिला व दिग्दर्शित केला असून, लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे.
Mardaani 3: तिसऱ्या दिवशीही राणी मुखर्जीचा चित्रपट सुस्साट; Box Office वर केली एवढ्या कोटींची कमाई!






