(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी नुकतेच, म्हणजेच २६ फेब्रुवारी रोजी लग्न केले आहे. लग्नापासून हे दोघेही सतत चर्चेत असल्याचे आता दिसून येत आहे. त्यांच्या लग्नातील एकापाठोपाठ एक फोटो आणि व्हिडीओ समोर येत असून चाहत्यांकडून त्यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मात्र या सगळ्यात रश्मिका आणि विजय यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर केलेल्या एका पोस्टने चाहत्यांचे खास लक्ष वेधून घेतले आहे. आता नक्की ही पोस्ट काय आहे? आणि ते कपल पुन्हा का चर्चेत आले आहेत? हे आपण जाणून घेणार आहोत.
रश्मिका–विजय यांचा मोठा निर्णय
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा पुन्हा एकदा चर्चेत आल्याचे समोर आले आहे. आणि यावेळी कारण ठरलं आहे त्यांची नवी सोशल मीडिया पोस्ट. त्यांनी नुकतीच इन्स्टाग्रामवर एक खास संदेश शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. आता ही आनंदाची बातमी काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
”हे खूप भयानक आहे”, US Iran युद्धात UAE मध्ये अडकली अभिनेत्री Esha Gupta, पोस्टद्वारे दिली माहिती
शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “या देशातील सुंदर मनाच्या लोकांनो, तुम्ही नेहमीच आमच्या प्रवासाचा आणि आमच्या प्रेमाचा भाग राहिला आहात. आमचे लग्न तुमच्या साक्षीने साजरे करणे आम्हाला खरोखरच आनंद देणारे आहे. आणि भारतात आनंद कसा साजरा केला जातो? मिठाई आणि जेवणाने! म्हणूनच १ मार्च रोजी आम्ही संपूर्ण देशभर प्रेमाने आणि मिठाईंनी भरलेले ट्रक पाठवत आहोत, जेणेकरून आमच्या आयुष्यातील हा मोठा क्षण आम्ही तुमच्यासोबत वाटू शकू. तसेच देशभरातील अनेक मंदिरांमध्ये अन्नदानही करत आहोत. तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादांची आम्हाला खूप गरज आहे.” या निर्णयामुळे सोशल मीडियावर या जोडप्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून चाहत्यांकडून त्यांच्या या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.
या चित्रपटात दोघेही दिसणार एकत्र
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लग्नानंतर आता एकत्र चित्रपटात झळकणार आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘रणबाली’ असे आहे. हा चित्रपट ११ सप्टेंबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. तसेच या चित्रपटाचे पोस्टरने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. आणि भरभरून प्रतिसाद देत आहेत.






